शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंघाचे केंद्र कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 02:51 IST

चार महिन्यांत एकही शेतकरी फिरकला नाही!

गिरीश राऊत खामगाव, दि. ६- कधीकाळी वैभव असणार्‍या पणन महासंघाची आजरोजी दयनीय अवस्था झाली असून, पणन महासंघाच्या जिल्हाभरातील केंद्रांवर गत चार महिन्यांपासून एकही शेतकरी फिरकला नसून, जिल्ह्यात तीन केंद्रांवर उद्घाटनापासून एक किलो कापसाची खरेदीसुद्धा गत चार महिन्यांपासून झाली नाही. पणन महासंघापेक्षा खुल्या बाजारात कापसाला मिळणारा भाव जास्त असल्याने अशी परिस्थिती पणन महासंघावर ओढवली असल्याचे दिसून येत आहे. शेतमाल उत्पादन खर्च व शेतमाल तयार झाल्यानंतरही विक्रीपर्यंतचा खर्च, याचा हिशेब केल्यास शेतमालास मिळणारा हमीभाव कमीच आहे. त्यातच इतर पिकांच्या तुलनेत कापूस उत्पादन खर्चाचे प्रमाण जास्तच असते. मात्र खर्च वाढला असताना दरवर्षी नगण्य अशी फक्त ५0 रुपये प्रतिक्विंटल हमीभावात वाढ होत आहे. आजरोजी पणन महासंघाकडून सर्वात उच्च प्रतिच्या कापसाला ४ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल असा हमीदर दिला जात आहे. कापसाला किमान हमीदर मिळावा, यासाठी यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात शेगाव, देऊळगाव राजा व जळगाव जामोद, अशा तीन ठिकाणी हमीदराने कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. तसेच या केंद्रावरील आवक पाहता जिल्ह्यातील इतर तालुक्यातही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार होते. मात्र, या तीनही केंद्रांवर गत चार महिन्यांपासून एकाही शेतकर्‍याने आपला कापूस विकण्यासाठी आणला नाही. परिणामी या केंद्रावर गत चार महिन्यात एक किलोही कापूस खरेदी झाला नाही. उद्घाटनालाही सुद्धा या केंद्रांवर कापूस नव्हता. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीदरात कापूस विकणे शेतकर्‍यांना परवडत नसल्याने विकल्यापेक्षा घरात पडून असलेला बरा, अशी मानसिकता शेवटी शेतकर्‍यांनी करून घेतली आहे. हमीभावात कापूस मिळतच नसल्याने जागतिक बाजारपेठेत कापसाचे भाव कमी असतानादेखील व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यापार्‍यांना हमीदरापेक्षा जास्तच भाव देऊन कापसाची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे खुल्या बाजारात आजरोजी कापूस ५५00 ते ६000 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. पणन महासंघाचे हमीभाव व खुल्या बाजारातील ही तफावत पाहता पणन महासंघाचे भाव कमीच आहेत. एकूणच कापसाच्या भावात समाधानकारक वाढ होत नसल्याने अल्पभूधारकांनी कापूस पीक लागवडीला फाटा दिला आहे. तर सधन व बागायती शेती असणार्‍या शेतकर्‍यांकडूनच कापसाची लागवड केली जात आहे. परिणामी कापूसपट्टा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याची ही ओळख हळूहळू संपत आहे. तेव्हा शासनाने उत्पादन खर्चाचा विचार करता कापसाचे हमीदर वाढविण्याबाबत प्रयत्न करावे, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकर्‍यांकडून केली जात आहे.