शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

विवेकानंदांचा विश्‍वधर्म हा मानवतेचा परमोच्च बिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST

हिवरा आश्रम : विवेकानंदांनी पाश्‍चिमात्य देशात केलेले धर्मविवेचन अत्यंत मूलगामी तसेच परखड स्वरूपाचे होते. धर्म म्हणजे सेवा होय. ...

हिवरा आश्रम : विवेकानंदांनी पाश्‍चिमात्य देशात केलेले धर्मविवेचन अत्यंत मूलगामी तसेच परखड स्वरूपाचे होते. धर्म म्हणजे सेवा होय. दीन, दुःखी,पीडित यांच्यासाठी केवळ कळवळा नको, तर त्यांचे दुःख निवारण्यासाठी पुढे येणे होय. धर्माच्या चुकीच्या अन्वयार्थाने माणसात दुरावा निर्माण होत असेल, बाह्य चालीरीतीने कलह वाढत असतील व मानव त्यांच्या भक्ष्यस्थानी असेल, तर अस्तित्वात असलेल्या धर्माव्यतिरिक्त विश्‍वधर्माची स्थापना करूया म्हणजे धर्म कलह थांबतील. हा स्वामीजींचा विचार केवळ मानव समाजाच्या अभ्युदयासाठी, त्‍यांच्या सुखासाठी असलेला मानवतेचा परमोच्च बिंदू होय, असे विचार विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष तथा गीतेचे तत्त्वचिंतक आर. बी. मालपाणी यांनी केले. विवेकानंद जयंती महोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शुकदास महाराजांनी केलेली विवेकानंद आश्रमाची स्थापना हा स्वामीजींच्या विचारांचे कृतिशील प्रगटीकरण आहे, असेही ते म्हणाले. शासनाच्या परवानगीने मर्यादित लाेकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. महापंगत, यात्रा, शोभायात्रा, मिरवणूक, आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरी व्यासपीठावरून होणारे कार्यक्रम लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचविले जातील. २, ३, ४ फेब्रुवारीला आश्रमात ज्ञान, विज्ञान प्रबोधनाचा यज्ञ प्रज्वलित होऊन त्याची परिमाणकारिता सर्वदूरपर्यंत जाणवेल अशी मला आशा आहे. उत्सवाची महापंगत ही सामूहिक शक्तीचे विराट दर्शन असते. भेदाभेद विसरून अवघा समाज एकत्रित येणे व एकमेकांना प्रसाद भरविणे या परमोच्च क्षणासाठी महापुरुषांनी, संस्थापकांनी अहोरात्र प्रयत्न केले. काही काळ का होईना जगण्याच्या त्या भावस्थितीत आपण जात असतो. यावर्षी मात्र आपण प्रत्येकाने आपल्या घरीच प्रसाद बनवून एकमेकांना भरवूया, कुटुंबातील सगळ्यांनी एकमेकांना या सुखाची अनुभूती देऊया. जयंती उत्सवाचे व्यासपीठावरून होणारे कार्यक्रम अत्यंत दर्जेदार व ख्यातिकीर्त मान्यवरांचे प्रबोधन आहे. त्यांचा लाभही केबल नेटवर्क, युटूब, फेसबुक, आदींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली आहे, ही सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.