शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

विवेकानंदांचा विश्‍वधर्म हा मानवतेचा परमोच्च बिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST

हिवरा आश्रम : विवेकानंदांनी पाश्‍चिमात्य देशात केलेले धर्मविवेचन अत्यंत मूलगामी तसेच परखड स्वरूपाचे होते. धर्म म्हणजे सेवा होय. ...

हिवरा आश्रम : विवेकानंदांनी पाश्‍चिमात्य देशात केलेले धर्मविवेचन अत्यंत मूलगामी तसेच परखड स्वरूपाचे होते. धर्म म्हणजे सेवा होय. दीन, दुःखी,पीडित यांच्यासाठी केवळ कळवळा नको, तर त्यांचे दुःख निवारण्यासाठी पुढे येणे होय. धर्माच्या चुकीच्या अन्वयार्थाने माणसात दुरावा निर्माण होत असेल, बाह्य चालीरीतीने कलह वाढत असतील व मानव त्यांच्या भक्ष्यस्थानी असेल, तर अस्तित्वात असलेल्या धर्माव्यतिरिक्त विश्‍वधर्माची स्थापना करूया म्हणजे धर्म कलह थांबतील. हा स्वामीजींचा विचार केवळ मानव समाजाच्या अभ्युदयासाठी, त्‍यांच्या सुखासाठी असलेला मानवतेचा परमोच्च बिंदू होय, असे विचार विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष तथा गीतेचे तत्त्वचिंतक आर. बी. मालपाणी यांनी केले. विवेकानंद जयंती महोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शुकदास महाराजांनी केलेली विवेकानंद आश्रमाची स्थापना हा स्वामीजींच्या विचारांचे कृतिशील प्रगटीकरण आहे, असेही ते म्हणाले. शासनाच्या परवानगीने मर्यादित लाेकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. महापंगत, यात्रा, शोभायात्रा, मिरवणूक, आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरी व्यासपीठावरून होणारे कार्यक्रम लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचविले जातील. २, ३, ४ फेब्रुवारीला आश्रमात ज्ञान, विज्ञान प्रबोधनाचा यज्ञ प्रज्वलित होऊन त्याची परिमाणकारिता सर्वदूरपर्यंत जाणवेल अशी मला आशा आहे. उत्सवाची महापंगत ही सामूहिक शक्तीचे विराट दर्शन असते. भेदाभेद विसरून अवघा समाज एकत्रित येणे व एकमेकांना प्रसाद भरविणे या परमोच्च क्षणासाठी महापुरुषांनी, संस्थापकांनी अहोरात्र प्रयत्न केले. काही काळ का होईना जगण्याच्या त्या भावस्थितीत आपण जात असतो. यावर्षी मात्र आपण प्रत्येकाने आपल्या घरीच प्रसाद बनवून एकमेकांना भरवूया, कुटुंबातील सगळ्यांनी एकमेकांना या सुखाची अनुभूती देऊया. जयंती उत्सवाचे व्यासपीठावरून होणारे कार्यक्रम अत्यंत दर्जेदार व ख्यातिकीर्त मान्यवरांचे प्रबोधन आहे. त्यांचा लाभही केबल नेटवर्क, युटूब, फेसबुक, आदींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली आहे, ही सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.