शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

मानवी संवेदना दृढ करण्यासाठी विवेकानंद विचार साहित्य संमेलन - गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:49 IST

मानवी संवेदना अधिक दृढ करून त्यांच्या एकात्मतेचा विचार आम्ही समाजाच्या नसानसात भिनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. 

ठळक मुद्देस्वामिजींच्या एकात्मतेचा विचार समाजाच्या नसानसात भिनविणार!

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम:  स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त हिवरा आश्रम येथे आयोजित विवेकानंद विचार साहित्य संमेलन हे आगळे-वेगळे विचार संमेलन राहणार आहे. विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांना नवसमाज निर्मितीसाठी, राष्ट्र उभारणीसाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कसे प्रसारित करता येईल, हा उद्देश या संमेलनातून साधणे अपेक्षित आहे. मानवी संवेदना अधिक दृढ करून त्यांच्या एकात्मतेचा विचार आम्ही समाजाच्या नसानसात भिनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. सहा ते ८ जानेवारीदरम्यान होत असलेल्या स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाच्या पृष्ठभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांची उपस्थिती होती.  गोरे म्हणाले की, निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज या विरक्त संन्याशाने मानवसेवेसाठी विवेकानंदांच्या विचारांची अगदी गावकुसातून पेरणी केली. आयुष्यभर त्या विचारांचे जागरण केले. 

आगळे-वेगळे संमेलनविवेकानंद विचार साहित्य संमेलन हे आगळे-वेगळे आहे. निव्वळ औपचारिकतेच्या परंपरेला फाटा देणारे हे संमेलन असून, त्यात अध्यक्षपदासाठी घोडेबाजार नसेल. संमेलनस्थळावरून वादही नसेल. पंचतारांकित व्यवस्थेसाठी सारस्वतांची एकमेकांवर चिखलफेकही नसेल. संमेलनाच्या पवित्र व्यासपीठावर राजकीय पुढार्‍यांचा वावरही नसेल, असे गोरे म्हणाले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा