शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

निराधार चिमुकल्यांना विवेकानंद आश्रमाने दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST

हिवरा आश्रम : पतीने दुसरा विवाह करून वाऱ्यावर साेडलेल्या महिलेचा नुकताच कर्कराेगाने मृत्यू झाला़ त्यामुळे आई आणि वडिलांचा ...

हिवरा आश्रम : पतीने दुसरा विवाह करून वाऱ्यावर साेडलेल्या महिलेचा नुकताच कर्कराेगाने मृत्यू झाला़ त्यामुळे आई आणि वडिलांचा आधार गेल्याने पाेरक्या झालेल्या चिमुकल्या भावंडांना हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने आधार दिला़ या मुलांचे पालकत्व आश्रमाने स्वीकारले आहे़

पतीने दुसरा विवाह करून वाऱ्यावर साेडलेली सीमा साेनुने नावाची महिला काही वर्षांपूर्वी हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमात आली हाेती़ मिळेल ते काम करून ती आपला व दाेन मुलांचा सांभाळ करीत हाेती़ काही दिवसांपूर्वीच तिला कर्कराेग झाल्याचे निदान झाले हाेते़ उपचार सुरू करण्यापूर्वीच ८ जुलै रोजी तिचे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने निधन झाले. त्यामुळे आदित्य व गायत्री ही मुले आईविना पोरकी झाली. या मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी विवेकानंद आश्रमाने घेतली आहे. कोणीही नातेवाईक नसलेली व आधार नसलेली ही भावंडे आश्रमाची मुले म्हणून जगणार आहेत. त्यांना निवास, भोजन, शिक्षण व आरोग्य या सुविधा आश्रमातर्फे मिळणार आहेत.

आश्रमाने दिला आधार

सीमासारख्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या, संशयी पतीने झिडकारलेल्या, नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून जीवन वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या असंख्य महिला आपल्या मुलांचा सांभाळ करीत आश्रमाच्या अनेक सेवा उपक्रमात नोकरी करीत आहेत. परमपूज्य शुकदास महाराजांचा विवेकानंद आश्रम या महिलांना आधार देत आहे़

एक हजार मुली घेत आहेत शिक्षण

या विवेकानंदांच्या दिव्य विचारांचा परमपूज्य शुकदास महाराजांनी घेतलेला आदर्श म्हणजे आश्रमात एक हजार मुली शिक्षण घेत असून त्यांतील ६५० ते ७०० मुली वसतिगृहात राहत आहेत. पालकांनाही आपली मुलगी आश्रमात शिकते, ती नक्कीच कर्तृत्ववान आणि चारित्र्यसंपन्न होणार आहे, हा विश्वास वाटतो. आदित्य आणि गायत्री यांसारख्या असंख्य मुलांचे मायबाप झालेला विवेकानंद आश्रम हा सदैव जनसेवक व दरिद्री नारायणाची सेवा करणाऱ्या सेवकाच्या भूमिकेत राहणार आहे, असे आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी सांगितले़