शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

निराधार चिमुकल्यांना विवेकानंद आश्रमाने दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST

हिवरा आश्रम : पतीने दुसरा विवाह करून वाऱ्यावर साेडलेल्या महिलेचा नुकताच कर्कराेगाने मृत्यू झाला़ त्यामुळे आई आणि वडिलांचा ...

हिवरा आश्रम : पतीने दुसरा विवाह करून वाऱ्यावर साेडलेल्या महिलेचा नुकताच कर्कराेगाने मृत्यू झाला़ त्यामुळे आई आणि वडिलांचा आधार गेल्याने पाेरक्या झालेल्या चिमुकल्या भावंडांना हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने आधार दिला़ या मुलांचे पालकत्व आश्रमाने स्वीकारले आहे़

पतीने दुसरा विवाह करून वाऱ्यावर साेडलेली सीमा साेनुने नावाची महिला काही वर्षांपूर्वी हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमात आली हाेती़ मिळेल ते काम करून ती आपला व दाेन मुलांचा सांभाळ करीत हाेती़ काही दिवसांपूर्वीच तिला कर्कराेग झाल्याचे निदान झाले हाेते़ उपचार सुरू करण्यापूर्वीच ८ जुलै रोजी तिचे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने निधन झाले. त्यामुळे आदित्य व गायत्री ही मुले आईविना पोरकी झाली. या मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी विवेकानंद आश्रमाने घेतली आहे. कोणीही नातेवाईक नसलेली व आधार नसलेली ही भावंडे आश्रमाची मुले म्हणून जगणार आहेत. त्यांना निवास, भोजन, शिक्षण व आरोग्य या सुविधा आश्रमातर्फे मिळणार आहेत.

आश्रमाने दिला आधार

सीमासारख्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या, संशयी पतीने झिडकारलेल्या, नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून जीवन वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या असंख्य महिला आपल्या मुलांचा सांभाळ करीत आश्रमाच्या अनेक सेवा उपक्रमात नोकरी करीत आहेत. परमपूज्य शुकदास महाराजांचा विवेकानंद आश्रम या महिलांना आधार देत आहे़

एक हजार मुली घेत आहेत शिक्षण

या विवेकानंदांच्या दिव्य विचारांचा परमपूज्य शुकदास महाराजांनी घेतलेला आदर्श म्हणजे आश्रमात एक हजार मुली शिक्षण घेत असून त्यांतील ६५० ते ७०० मुली वसतिगृहात राहत आहेत. पालकांनाही आपली मुलगी आश्रमात शिकते, ती नक्कीच कर्तृत्ववान आणि चारित्र्यसंपन्न होणार आहे, हा विश्वास वाटतो. आदित्य आणि गायत्री यांसारख्या असंख्य मुलांचे मायबाप झालेला विवेकानंद आश्रम हा सदैव जनसेवक व दरिद्री नारायणाची सेवा करणाऱ्या सेवकाच्या भूमिकेत राहणार आहे, असे आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी सांगितले़