शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जलतज्ज्ञांची सावळा गावाला भेट

By admin | Updated: May 25, 2015 02:29 IST

जलतज्ज्ञांचे सावळवासियांना सिंचन तलाव व बंधा-याची निर्मिती करण्याचे आवाहन.

बुलडाणा : भारताचे जलपुरुष, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी २२ मे रोजी बाराही महिने पाण्याची टंचाई आणि टँकरफिल्ड असलेल्या सावळा गावाला भेट दिली. सावळ्यात एकमेव असलेल्या विहिरीची, परिसरातील पाणीस्रोत व जलसंधारणासाठी उपयुक्त ठरणार्‍या परिसराची त्यांनी पाहणी केली. कायम पाणीटंचाईच्या संकटात सापडलेल्या या गावाचे हे संकट दूर करण्यासाठी योग्य ठिकाणी सिंचन तलाव व बंधार्‍याची निर्मिती करण्याची गरज असल्याचे सांगून यासाठी जिल्हा प्रशासनालाही त्यांनी दोन साईट सुचविल्या. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे गाव सावळा हे कायम बाराही महिने पाणी टंचाईग्रस्त गाव आहे. तुपकरांनी या संदर्भात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांना माहिती दिली असता त्यांनी रविकांत तुपकरांसह प्रत्यक्ष गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. सावळा येथे एकमेव विहीर असून, या विहिरीत टँकरद्वारे किंवा पाईपलाईनच्या सहाय्याने पाणी सोडले जाते. या एकाच विहिरीवरून सर्व नागरिक पाणी नेतात. डॉ. राजेंद्रसिंह यांनी या विहिरीची पाहणी केली. तसेच गावाच्या परिसरात, गावाशेजारील डोंगर, दर्‍या आणि पाणथळ जागा अशी पाहणीदेखील त्यांनी केली. यावेळी तहसीलदार दीपक बाजड, भूजल सर्वेक्षण अधिकारी प्रवीण कथने यांच्यासह इतर अधिकारीदेखील उपस्थित होते. लघुसिंचन विभागाच्या वतीने या गावाच्या परिसरात प्रत्येकी १२ लक्ष रुपये खर्चाचे तीन बंधारे निर्माण करण्यात आले आहे; परंतु या बंधार्‍यांचा कोणताही उपयोग होताना दिसून येत नाही. पाण्याऐवजी या बंधार्‍यांमध्ये पैसाच जिरला असल्याचे मत डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. तसेच बंधारा बनविण्यापूर्वी योग्य जागेची निवड करणे आवश्यक असते. यासाठी त्यांनी स्वत: परिसराची पाहणी करून तहसीलदार दीपक बाजड यांना सिंचन तलावासाठी २ नवीन साईट सुचविल्या. नागरिकांच्या सहभागाशिवाय कोणतेच काम यशस्वीरित्या पूर्णत्वास जाऊ शकत नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव व जाणीव असल्याने राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने गावागावांमध्ये नागरिकांना एकत्रित करून जलक्रांतीचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले.