शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : 100 रुपयांच्या नोटा नसल्याने बाजार समित्या बंद, शेतकरी अडचणीत

By admin | Updated: November 9, 2016 16:00 IST

ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 9 - केंद्र सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे ...

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 9 - केंद्र सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला. 100 रुपयांच्या नोटा नसल्याने व्यापा-यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. शेतक-यांना याची कल्पना नसल्यामुळे अनेक शेतकरी बाजार समितीत शेतमाल घेवून आले आहेत. त्यामुळे शेतक-यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अनेक शेतकरी ग्रामीण भागातून कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे शेतमाल घेवून आले होते. मात्र, त्यांना बाजार समिती बंद असल्याचे समजले. शेतमाल खरेदी करणा-या व्यापा-यांनी सुट्टे पैसे नसल्याने चक्क बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्यावर त्यांना हजारो रूपये द्यावे लागतात. 
 
अनेक व्यापारी एटीएम किंवा बँकेतून पैसे काढतात. मात्र, दोन दिवस बँक बंद असून, व्यापा-यांकडे सुट्टे पैसे नसल्याचे कारण देत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी गावातून हजारो रूपये भाड्याचे वाहन करून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी घेवून येतात. बाजार समिती बंद असल्याची जराही कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांना वाहनाचे भाडे देण्याचा भुर्दंड सहन करावा लागला. बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत चिखली, मेहकर तालुक्यासह शेकडो किलोमीटरवरुन शेतकरी शेतमाल घेवून येतात. व्यापा-यांनी बाजार समित्या बंद ठेवण्याच्या भूमिकेमुळे शेतक-यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. 
 
हमालांवर उपासमारीची वेळ
हमाल व मापाडी कामगार यांचा उदनिर्वाह बाजार समितीतील दररोजच्या उत्पन्नावर चालत असल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.  बुधवारी नेहमीप्रमाणे बाजार समित्यांमध्ये हमाल व मापाडी आले. मात्र, त्यांना बाजार समिती बंद असल्याचे समजले. व्यापा-यांनी  अचानक बंद पुकारल्यामुळे हमाल, मापाडींचा एक दिवसाचा रोजगार बुडाला आहे.
 
बंदची अधिकृत घोषणा नाही
व्यापा-यानी बुधवारी कृषि उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत  व्यापारी संघटनेने कोणतेही पत्र किंवा अधिकृत घोषणा केली नाही.  - वनीता साबळे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलडाणा.
 
शेतक-यांना आर्थिक भुर्दंड  
नेहमीप्रमाणे सोयाबिन विक्रीसाठी आणले होते, मात्र बाजार समिती बंद असल्याने आता शेतमाल परत न्यावा लागला. यामुळे वाहनाचे भाडेही द्यावे लागणार असल्याने अधिक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार  आहे. - सर्जेराव भुतेकर,  शेतकरी, पाडळी.
 
धुळ्यातही कृषि उत्पन्न बाजार समिती बंद
दरम्यान, शंभर रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात नसल्याने धुळे आणि पिंपळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी आणि समितीच्या पदाधिका-यांनी हा निर्णय घेतला आहे.
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844hg0