शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

VIDEO : बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील जैवविविधता धोक्यात

By admin | Updated: November 8, 2016 16:16 IST

 ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 8 - ज्ञानगंगा अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून अखाद्य वनस्पतींचे अतिक्रमण वाढत असल्यामुळे पारंपरिक गवत नामशेष ...

 ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 8 - ज्ञानगंगा अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून अखाद्य वनस्पतींचे अतिक्रमण वाढत असल्यामुळे पारंपरिक गवत नामशेष होत आहे. अखाद्य वनस्पती प्राणी खात नाहीत तसेच यामध्ये एकही सजीव वास्तव्य करीत नसल्यामुळे हे
जंगल निर्जिव होण्याच्या मार्गावर आहे. या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
 
जिल्ह्यातील २००.५ हेक्टरवर ज्ञानगंगा अभयारण्य पसरलेले आहे.  जंगलामध्ये हरिण, काळविट, नीलगाईंसह अनेक तृणभक्षी प्राणी वास्तव्यास आहेत. घनदाट असलेल्या या अभ्यारण्यात पूर्वी गवताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. यामुळे  येथे तृणभक्षी प्राणी वास्तव्यास होते. त्यामुळे मांसभक्षी प्राण्यांचीही संख्या वाढली होती.
 
या जंगलात माखले, शहाळा, पवत्या, तिखाडी हे नैसर्गिक गवत आहे. हे खाद्य गवत असून, यामध्ये विविध जीव, जंतूंसह नाकतोडे, फूलपाखरू यांचेदेखील वास्तव्य आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या अभयारण्यात अखाद्य वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. अखाद्य वनस्पतीमध्ये रानतुळस, तरोटा, फुली यांचा समावेश आहे. रानतुळस ही वनस्पती झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
 
ही वनस्पती कोणताही प्राणी खात नाही. शिवाय, या वनस्पतीचा उग्र वासदेखील येतो. त्यामुळे  ही वनस्पती असलेल्या भागात प्राणी वास्तव्यही करीत नाही. यासोबतच रानतुळस असलेल्या जमिनीवर दुसरे कोणतेही गवत उगवत नाही. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील जंगल हिरवे दिसत असले तरी निर्जिव झाले आहे. तसेच जैवविविधताही संपुष्टात येत आहे.
 
 
ज्ञानगंगा अभयारण्यातून गवतच नामशेष होत असल्यामुळे येथील हरिण, नीलगाय हे जंगला लगतच्या शेतांमध्ये असलेल्या पिकांकडे वळले आहेत. परिणामी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतक-यांच्या शेकडो हेक्टरवरील पिके हरिण आणि नीलगाय फस्त करत आहेत.  तृणभक्षी प्राणी जंगलातून बाहेर आल्यामुळे मांसभक्षी प्राणीदेखील जंगलाबाहेर येत आहेत. त्यामुळे अस्वलाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटनादेखील समोर आली आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्याच्याही घटना घडल्या आहेत.  
 
वनविभागाच्या उपाययोजना शून्य
एका वर्षापूर्वी वनविभागाच्या ट्रॅप कॅमे-यामध्ये ज्या ठिकाणी सर्वत्र केवळ गवतच असल्याचे छायाचित्र काढण्यात आले आहे. त्या ठिकाणी आता केवळ रानतुळसच दिसत आहे. ही समस्या गंभीर असली तरी याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. रानतुळसचे प्रमाण कमी करण्याकरिता किंवा यावर नियंत्रण मिळविण्याकरिता वनविभागाच्यावतीने आतापर्यंत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
 
अस्वलांचे खाद्य संपुष्टात
अस्वलाचे मुळ खाद्य कंदमूळ आहे. सोबतच अस्वल वारूळातील मुंग्या, उदई, किटकदेखील खातात. रानतुळस ही दाट पसरते व त्याचा अत्यंत उग्र वास येतो. त्यामुळे या भागात कोणतेही किटक नाहीत. परिणामी अस्वलाचे खाद्यही रानतुळसमुळे संपुष्टात येत आहे.
 
अभायरण्य प्रशासनाकडून  लवकरच पाऊल उचलणार 
'ज्ञानगंगा अभयारण्यातील रानतुळस वाढत असून गवताचे क्षेत्र कमी होत आहे. ही गंभीर बाब आहे. रानतुळस कोणत्याही प्राण्याचे खाद्य नाही. वनविभाग याबाबत लवकरच पावले उचलणार आहे', असे ज्ञानगंगा अभयारण्यचे एससीएफ पोळ यांनी सांगितले आहे. 
 

 

https://www.dailymotion.com/video/x844h7s