शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

महाराष्ट्रात विदर्भाचा विकास अशक्य- चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:21 IST

२0२८ पर्यंतच काय यापुढील हजार वर्ष जरी महाराष्ट्रात राहिलो तरी विदर्भाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन पुकारणार १५ ऑक्टोबरला खासदारांचा राजीनामा मागणार!

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: विदर्भाला कायम दुर्लक्षित ठेवून विदर्भाच्या वाट्याचा २३ टक्के विकास निधी विदर्भाला न देता इतरत्र पळवून नेणे, राज्याचा कायम तुटीचा अर्थसंकल्प आणि राज्यातील नोकर्‍यांच्या तुलनेतही विदर्भातील बेरोजगारांना न मिळणार्‍या नोकर्‍या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजवर विदर्भाचा जवळपास ७५ हजार कोटी रुपयांचा अनुशेष कधीही भरून निघणे शक्य नाही. त्यामुळे २0२८ पर्यंतच काय यापुढील हजार वर्ष जरी महाराष्ट्रात राहिलो तरी विदर्भाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात १३ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परीषदेत अँड. चटप बोलत होते. यावेळी अँड. सुरेश वानखेडे, देवीदास कणखर, भिकाजी सोळंकी, मुरलीधर महाराज येवले यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना अँड. वामनराव चटप म्हणाले की, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी येत्या २८ सप्टेंबरला नागपूर करार आणि केळकर समितीच्या अहवालांची होळी विदर्भातील सर्वंच जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, खामगाव आणि मलकापूर येथे ही होळी आयोजित करण्यात येणार असून, लगतच्या तालुक्यातील विदर्भवाद्यांनी या आंदोलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले. करून सिंचन, रस्ते विकास, शिक्षण, आरोग्य अशा विविध विभागातील विदर्भाचा अनुशेष ७५ हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. केळकर समितीच्या अहवालानुसार सन २0२८ पर्यंत हा अनुशेष भरून काढल्या जाईल; परंत पुढील हजार वर्षापर्यंतही हा अनुशेष भरून काढणे कोणाच्याही सरकारला शक्य होणार नसल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे अँड. चटप म्हणाले. विदर्भातील बेरोजगारांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असताना निधीप्रमाणे नोकर्‍यांच्या अनुशेषातही सातत्याने वाढच होत आहे त्यामुळे बेरोजगारांचाही अनुशेष वाढतच आहे. त्यामुळे आता सरकारने वेगळे स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावे, अशी मागणी यावेळी वामनराव चटप यांनी केली. 

१५ ऑक्टोबरला खासदारांचा राजीनामा मागणार!विदर्भातील १0 खासदारांपैकी एकाही खासदाराने राधामोहनसिंग यांचे वक्तव्य खोडून काढले नाही. त्यामुळे विदर्भाच्या निर्मितीसाठी आणि विदर्भातील शेतकर्‍यांचा अपमान होत असताना संसदेत तोंडही न उघडणार्‍या खासदारांनी राजीनामाच दिला पाहिजे म्हणून आधी नितीन गडकरी यांचा राजीनामा मागितला होता. आता १५ ऑक्टोबरला बुलडाण्याच्या खासदारांचा बुलडाणा येथे जाऊन राजीनामा मागणार असल्याची माहिती यावेळी अँड. चटप यांनी दिली.