शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

महाराष्ट्रात विदर्भाचा विकास अशक्य- चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:21 IST

२0२८ पर्यंतच काय यापुढील हजार वर्ष जरी महाराष्ट्रात राहिलो तरी विदर्भाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन पुकारणार १५ ऑक्टोबरला खासदारांचा राजीनामा मागणार!

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: विदर्भाला कायम दुर्लक्षित ठेवून विदर्भाच्या वाट्याचा २३ टक्के विकास निधी विदर्भाला न देता इतरत्र पळवून नेणे, राज्याचा कायम तुटीचा अर्थसंकल्प आणि राज्यातील नोकर्‍यांच्या तुलनेतही विदर्भातील बेरोजगारांना न मिळणार्‍या नोकर्‍या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजवर विदर्भाचा जवळपास ७५ हजार कोटी रुपयांचा अनुशेष कधीही भरून निघणे शक्य नाही. त्यामुळे २0२८ पर्यंतच काय यापुढील हजार वर्ष जरी महाराष्ट्रात राहिलो तरी विदर्भाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात १३ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परीषदेत अँड. चटप बोलत होते. यावेळी अँड. सुरेश वानखेडे, देवीदास कणखर, भिकाजी सोळंकी, मुरलीधर महाराज येवले यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना अँड. वामनराव चटप म्हणाले की, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी येत्या २८ सप्टेंबरला नागपूर करार आणि केळकर समितीच्या अहवालांची होळी विदर्भातील सर्वंच जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, खामगाव आणि मलकापूर येथे ही होळी आयोजित करण्यात येणार असून, लगतच्या तालुक्यातील विदर्भवाद्यांनी या आंदोलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले. करून सिंचन, रस्ते विकास, शिक्षण, आरोग्य अशा विविध विभागातील विदर्भाचा अनुशेष ७५ हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. केळकर समितीच्या अहवालानुसार सन २0२८ पर्यंत हा अनुशेष भरून काढल्या जाईल; परंत पुढील हजार वर्षापर्यंतही हा अनुशेष भरून काढणे कोणाच्याही सरकारला शक्य होणार नसल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे अँड. चटप म्हणाले. विदर्भातील बेरोजगारांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असताना निधीप्रमाणे नोकर्‍यांच्या अनुशेषातही सातत्याने वाढच होत आहे त्यामुळे बेरोजगारांचाही अनुशेष वाढतच आहे. त्यामुळे आता सरकारने वेगळे स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावे, अशी मागणी यावेळी वामनराव चटप यांनी केली. 

१५ ऑक्टोबरला खासदारांचा राजीनामा मागणार!विदर्भातील १0 खासदारांपैकी एकाही खासदाराने राधामोहनसिंग यांचे वक्तव्य खोडून काढले नाही. त्यामुळे विदर्भाच्या निर्मितीसाठी आणि विदर्भातील शेतकर्‍यांचा अपमान होत असताना संसदेत तोंडही न उघडणार्‍या खासदारांनी राजीनामाच दिला पाहिजे म्हणून आधी नितीन गडकरी यांचा राजीनामा मागितला होता. आता १५ ऑक्टोबरला बुलडाण्याच्या खासदारांचा बुलडाणा येथे जाऊन राजीनामा मागणार असल्याची माहिती यावेळी अँड. चटप यांनी दिली.