शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा : खांदेवाले

By admin | Updated: April 16, 2015 00:42 IST

लोणार येथे विदर्भ कनेक्ट संघटनेची बैठक.

लोणार (जि. बुलडाणा): : सुमारे ५६ वर्षांंच्या कालखंडात राज्यकर्त्यांंनी अर्थसंकल्पात विदर्भाच्या हातात भोपळाच दिला आहे. त्यामुळे विदर्भाला विकासासाठी वाटच पाहावी लागत आहे. विकासाच्या बाबतीत विदर्भात सिंचन रस्ते, विद्युत, रोजगार यांसह सर्वच क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर अनुशेष निर्माण झालेला असून, तो भरून काढण्यासाठी विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायलाच हवा, असे प्रतिपादन स्वतंत्र विदर्भाचे प्रणेते तथा विदर्भ कनेक्ट संघटनेचे अध्यक्ष अँड. निरज खांदेवाले यांनी केले. येत्या १ मेपर्यंंत विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्याकरिता चर्चा करण्यासाठी स्थानिक भागवत चित्र मंदिराच्या सभागृहात ११ एप्रिल रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेश मापारी होते. खांदेवाले पुढे म्हणाले की, विदर्भाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता, विदर्भात खनिज, पाणी, वीज आणि नैसर्गिक वनसंपदेची भरभराट आहे. हे असतानासुद्धा पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ विकासाबाबत मागासलेलाच का? विदर्भाची संस्कृती वेगळी असून, या ठिकाणी वास्तव्यास असणार्‍या नागरिकांची जीवनशैलीही मुंबई, पुणे आणि नाशिक येथील नागरिकांच्या जीवनशैलीपेक्षा वेगळीच आहे. यामुळे इंग्रज राजवटीत लॉर्ड मॉन्टेग्यू यांनी विदर्भाला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी ब्रिटिश महाराणीकडे केली होती. विदर्भाला इंग्रज राजवटीतच स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला होता. तरीसुद्धा १ मे १९६0 रोजी विदर्भाला नागपूर कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोंबले गेले. १९६0 साली तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भाला विकासाबाबत झुकते माप देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र विदर्भातील तरुणांना शासकीय नोकरीत केवळ सात टक्केच वाटा मिळतो. अकोला येथील कृषी विद्यापीठ नगर जिल्ह्यातील राहुरी येथे नेण्याचे षड्यंत्र सरकारने केले होते. विदर्भाचा हा इतिहास रक्तरंजित असल्याचेही अँड. खांदेवाले यांनी सांगितले.