शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा : खांदेवाले

By admin | Updated: April 16, 2015 00:42 IST

लोणार येथे विदर्भ कनेक्ट संघटनेची बैठक.

लोणार (जि. बुलडाणा): : सुमारे ५६ वर्षांंच्या कालखंडात राज्यकर्त्यांंनी अर्थसंकल्पात विदर्भाच्या हातात भोपळाच दिला आहे. त्यामुळे विदर्भाला विकासासाठी वाटच पाहावी लागत आहे. विकासाच्या बाबतीत विदर्भात सिंचन रस्ते, विद्युत, रोजगार यांसह सर्वच क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर अनुशेष निर्माण झालेला असून, तो भरून काढण्यासाठी विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायलाच हवा, असे प्रतिपादन स्वतंत्र विदर्भाचे प्रणेते तथा विदर्भ कनेक्ट संघटनेचे अध्यक्ष अँड. निरज खांदेवाले यांनी केले. येत्या १ मेपर्यंंत विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्याकरिता चर्चा करण्यासाठी स्थानिक भागवत चित्र मंदिराच्या सभागृहात ११ एप्रिल रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेश मापारी होते. खांदेवाले पुढे म्हणाले की, विदर्भाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता, विदर्भात खनिज, पाणी, वीज आणि नैसर्गिक वनसंपदेची भरभराट आहे. हे असतानासुद्धा पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ विकासाबाबत मागासलेलाच का? विदर्भाची संस्कृती वेगळी असून, या ठिकाणी वास्तव्यास असणार्‍या नागरिकांची जीवनशैलीही मुंबई, पुणे आणि नाशिक येथील नागरिकांच्या जीवनशैलीपेक्षा वेगळीच आहे. यामुळे इंग्रज राजवटीत लॉर्ड मॉन्टेग्यू यांनी विदर्भाला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी ब्रिटिश महाराणीकडे केली होती. विदर्भाला इंग्रज राजवटीतच स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला होता. तरीसुद्धा १ मे १९६0 रोजी विदर्भाला नागपूर कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोंबले गेले. १९६0 साली तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भाला विकासाबाबत झुकते माप देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र विदर्भातील तरुणांना शासकीय नोकरीत केवळ सात टक्केच वाटा मिळतो. अकोला येथील कृषी विद्यापीठ नगर जिल्ह्यातील राहुरी येथे नेण्याचे षड्यंत्र सरकारने केले होते. विदर्भाचा हा इतिहास रक्तरंजित असल्याचेही अँड. खांदेवाले यांनी सांगितले.