शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पहिल्याच दिवशी शिक्षण हक्काची पायमल्ली

By admin | Updated: June 28, 2016 01:58 IST

विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेच नाहीत; ५ कोटी ८२ लाखांच्या निधीत गोंधळ.

विवेक चांदूरकर / बुलडाणा शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना गणवेश देण्याचा नियम असतानाही जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशाविनाच शाळेत यावे लागले. याकरिता शासनाने ५ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी वितरित केला असून, या निधीचा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाच्यावतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येत आहेत. शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांच्या गणवेशसाठी लागणार निधी देण्यात येतो. सदर निधी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचे असलेल्या संयुक्त बँक खात्यात जिल्हा परिषद पाठविते. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने सदर निधीतून गणवेश खरेदी करून शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना द्यायला हवा. सदर गणवेश परिधान करून विद्यार्थी शाळेत पहिल्या दिवशी येईल, अशी शासनाची संकल्पना आहे. मात्र या संकल्पनेला जिल्ह्यात हरताळ फासण्यात आला आहे. यावर्षी सदर निधी बुलडाणा जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्यांनी हा निधी शाळा व्यवस्थापन समितीला पाठविला. मात्र, शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच नाही. त्यामुळे सदर निधीचा योग्य विनियोग झाला की घोळ झाला, याबाबत संशय निर्माण होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरिता मोताळा तालुक्यातील खडकी, खामखेड व राजुरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. मात्र, यापैकी खामखेड वगळता दोन्ही ठिकाणच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे गणवेश नव्हता, असे अलका खंडारे यांनी सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंंत गणवेश पोहोचलाच नसल्याचे वास्तव आहे.गोड पदार्थ म्हणून दिली गोड खिचडीशिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी गोड पदार्थ द्यायचा असल्यामुळे अनेक शाळांनी गोड खिचडी करून विद्यार्थ्यांंना दिली. मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ असणे आवश्यक होते. मात्र, शाळांनी चक्क खिचडीच गोड करून विद्यार्थ्यांंना दिली. जिल्हा परिषद अध्यक्षांनी बैठक घेतल्यावरही अंमलबजावणी नाही नियमानुसार विद्यार्थ्यांंना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळावा, याकरिता जिल्हा परिषद अध्यक्षांनी पंधरा दिवसांपूर्वी बैठक घेऊन निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यांंपर्यंंत गणवेश पोहोचले नाहीत.