शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात घरपाेच मिळाला भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:32 IST

बुलडाणा: कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी मार्च ते जून दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे, सर्वसान्याबराेबरच भाजीपाला उत्पादक शेतकरीही संकटात ...

बुलडाणा: कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी मार्च ते जून दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे, सर्वसान्याबराेबरच भाजीपाला उत्पादक शेतकरीही संकटात सापडले हाेते. या काळात शासनाने सुरू केलेली द्वारपाेच याेजना शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही दिलासा देऊन गेली.

कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. नंतर टप्प्याटप्पयाने त्यात शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूू मिळविण्यासाठी मोठे हाल झाले होते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अनुषंगिक विषयान्वये नियोजन करण्यात आले होते. प्रारंभीच्या काळात प्रामुख्याने शहरी भागात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे नागरी भागातील जवळपास ९५ ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा नागरिकांना चांगला आधार मिळाला. जिल्ह्यातील १, २६४ शेतकऱ्यांची व ४६ शेतकरी गटांची भूमिका महत्त्वाची राहली होती. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले माल कृषी विभागाच्या सहकार्याने थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमातंर्गत द्वारपोच या भाजीपाल्याची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे उत्पादक ते थेट ग्राहक अशी साखळीच या कालावधीत जिल्ह्यात निर्माण झाल्याचे चित्र झाले होते.

त्यानुषंगाने संबंधितांना लॉकडाऊन काळात पासेसही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दुसरीकडे काही ठिकाणी कृषी विभागाच्या सहकार्याने टरबुज व अन्य फळांचीही विक्री करण्यात आली होती. त्याचा थेट ग्राहकांना फायदा झाला. काही शेतकरी गटांनी ट्रॅक्टरद्वारे थेट ग्राहकापर्यंत पोहेचून त्यांना फळविक्री केली होती.

त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही या १,२६४ शेतकऱ्यांचे व ४६ शेतकरी गटातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र गतिमान झाले होते.

शेतकरी करतात थेट विक्री

कृषी विभागाच्या या याेजनेतून शेतकऱ्यांना शेतमालाला चांगला भाव मिळाला. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची हाेणारी लूट थांबली. त्यामुळे, लॉकडाऊन संपल्यानंतरही शेतकऱ्यांनी भाजीपाला, टरबूज, खरबुज विक्री सुरू केली आहे. टॅक्टरमध्ये माल भरून शेतकरी दिवसभर शहरातील विविध भागात विक्री करीत आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भावही मिळत असल्याचे चित्र आहे.