शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात घरपाेच मिळाला भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:32 IST

बुलडाणा: कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी मार्च ते जून दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे, सर्वसान्याबराेबरच भाजीपाला उत्पादक शेतकरीही संकटात ...

बुलडाणा: कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी मार्च ते जून दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे, सर्वसान्याबराेबरच भाजीपाला उत्पादक शेतकरीही संकटात सापडले हाेते. या काळात शासनाने सुरू केलेली द्वारपाेच याेजना शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही दिलासा देऊन गेली.

कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. नंतर टप्प्याटप्पयाने त्यात शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूू मिळविण्यासाठी मोठे हाल झाले होते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अनुषंगिक विषयान्वये नियोजन करण्यात आले होते. प्रारंभीच्या काळात प्रामुख्याने शहरी भागात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे नागरी भागातील जवळपास ९५ ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा नागरिकांना चांगला आधार मिळाला. जिल्ह्यातील १, २६४ शेतकऱ्यांची व ४६ शेतकरी गटांची भूमिका महत्त्वाची राहली होती. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले माल कृषी विभागाच्या सहकार्याने थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमातंर्गत द्वारपोच या भाजीपाल्याची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे उत्पादक ते थेट ग्राहक अशी साखळीच या कालावधीत जिल्ह्यात निर्माण झाल्याचे चित्र झाले होते.

त्यानुषंगाने संबंधितांना लॉकडाऊन काळात पासेसही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दुसरीकडे काही ठिकाणी कृषी विभागाच्या सहकार्याने टरबुज व अन्य फळांचीही विक्री करण्यात आली होती. त्याचा थेट ग्राहकांना फायदा झाला. काही शेतकरी गटांनी ट्रॅक्टरद्वारे थेट ग्राहकापर्यंत पोहेचून त्यांना फळविक्री केली होती.

त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही या १,२६४ शेतकऱ्यांचे व ४६ शेतकरी गटातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र गतिमान झाले होते.

शेतकरी करतात थेट विक्री

कृषी विभागाच्या या याेजनेतून शेतकऱ्यांना शेतमालाला चांगला भाव मिळाला. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची हाेणारी लूट थांबली. त्यामुळे, लॉकडाऊन संपल्यानंतरही शेतकऱ्यांनी भाजीपाला, टरबूज, खरबुज विक्री सुरू केली आहे. टॅक्टरमध्ये माल भरून शेतकरी दिवसभर शहरातील विविध भागात विक्री करीत आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भावही मिळत असल्याचे चित्र आहे.