शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

भाजीपाला महागला, कांद्याचे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये किलोवर स्थिर आहेत. फळांचा हंगाम संपत आल्याने दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलही चार ते पाच रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.

बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा ५० रुपयांवर कायम आहे तर हिरवी मिरची ६० रुपये किलाे, वांगे ४० रुपये किलोवर पाेहोचले आहेत. आवक घटल्याने मेथी, पालकचे दरही वाढले आहेत. फळ बाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रे आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने जवळपास दुप्पटीने दर वाढले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे दर वाढल्याचे चित्र आहे. साेयाबीन तेल पाच ते सहा रुपयांनी तर शेंगदाणा तेल सात रुपयांनी वाढले आहे.

द्राक्षे बाजारात दाखल

गत आठवड्यापासून फळांच्या दरात माेठी वाढ झाली आहे. डिलक्स सफरचंद १४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. माेसंबीचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहे. डाळिंबाला गत आठवड्यात ६० रुपयांपर्यंत दर मिळाला. या आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपयांवर गेले आहेत. पपई व संत्र्यांच्या दरातही वाढ झाली आहे. द्राक्षे बाजारात दाखल झाली आहेत. मात्र, आवक कमी असल्याने हिरवी द्राक्षे २०० रुपये तर काळी द्राक्षे २४० रुपये किलाेने विकली जात आहेत. द्राक्षाची आवक वाढल्यानंतर भाव कमी हाेणार असल्याचे सांगितले जात आहे.

द्राक्षे बाजारात नुकतीच दाखल झाल्याने भाव वाढले आहेत. सफरचंद, माेसंबी व इतर फळेही महागली आहेत. आवक वाढल्यानंतरच द्राक्षांचा भाव कमी हाेणार आहे.

- सलमान बागवान, फळ विक्रेता

गत दाेन आठवड्यांपासून भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. कांद्याचे दर स्थिर आहेत. इतर भाजीपाला मात्र महागला आहे.

- ज्याेती भालेराव, भाजी विक्रेती