शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

भाजीपाला महागला, कांद्याचे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये किलोवर स्थिर आहेत. फळांचा हंगाम संपत आल्याने दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलही चार ते पाच रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.

बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा ५० रुपयांवर कायम आहे तर हिरवी मिरची ६० रुपये किलाे, वांगे ४० रुपये किलोवर पाेहोचले आहेत. आवक घटल्याने मेथी, पालकचे दरही वाढले आहेत. फळ बाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रे आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने जवळपास दुप्पटीने दर वाढले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे दर वाढल्याचे चित्र आहे. साेयाबीन तेल पाच ते सहा रुपयांनी तर शेंगदाणा तेल सात रुपयांनी वाढले आहे.

द्राक्षे बाजारात दाखल

गत आठवड्यापासून फळांच्या दरात माेठी वाढ झाली आहे. डिलक्स सफरचंद १४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. माेसंबीचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहे. डाळिंबाला गत आठवड्यात ६० रुपयांपर्यंत दर मिळाला. या आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपयांवर गेले आहेत. पपई व संत्र्यांच्या दरातही वाढ झाली आहे. द्राक्षे बाजारात दाखल झाली आहेत. मात्र, आवक कमी असल्याने हिरवी द्राक्षे २०० रुपये तर काळी द्राक्षे २४० रुपये किलाेने विकली जात आहेत. द्राक्षाची आवक वाढल्यानंतर भाव कमी हाेणार असल्याचे सांगितले जात आहे.

द्राक्षे बाजारात नुकतीच दाखल झाल्याने भाव वाढले आहेत. सफरचंद, माेसंबी व इतर फळेही महागली आहेत. आवक वाढल्यानंतरच द्राक्षांचा भाव कमी हाेणार आहे.

- सलमान बागवान, फळ विक्रेता

गत दाेन आठवड्यांपासून भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. कांद्याचे दर स्थिर आहेत. इतर भाजीपाला मात्र महागला आहे.

- ज्याेती भालेराव, भाजी विक्रेती