शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

वाढत्या तापमानामुळे भाजीपाला महागला!

By admin | Updated: April 10, 2017 00:43 IST

खामगाव : तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे.

बाजारात आवक घटल्याने वधारले भाव खामगाव : तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. वांग्यासह इतरही भाज्या किरकोळ बाजारात ४0 ते ५0 रुपये प्रतिकिलोच्यावर पोहोचल्या आहेत.शहरात भाजी बाजारपेठेत जिल्ह्यालगतच्या परिसरातील व गावखेड्यातून भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. फुलकोबी, पत्ताकोबी, कोथिंबीर, पालक, मेथी यासारखी भाजी जिल्ह्यातच तयार होते. यामुळे भाजीबाजार बाहेरील आवकवर फार अवलंबून नाही. पण, आता ही आवकरच घटल्याने दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात टमाटरची भरपूर आवक होऊ लागली होती. पण ऊन तापू लागल्यामुळे शहरात भाज्यांची आवक रोडावते आहे.शहराबाहेरील भाज्यांची आवक एकदम मंद झाली आहे. तसेच स्थानिक भाजीपालादेखील कमी प्रमाणात येत आहे. यामुळे दर दुप्पट झाले. केवळ पत्ताकोबी, लवकी आणि कोहळे सध्या तुलनेने स्वस्त आहेत. उर्वरित भाज्यांची मात्र आवक कमी झाली आहे.पुढील महिनाभर जवळपास हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. कांद्याने दिला गृहिणींना दिलासासध्या जिल्ह्यासह व लगतच्या जिल्ह्यातून कांदा बऱ्यापैकी येत आहे. यामुळे सध्या १0 ते १५ रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या कांद्याने दिलासा दिलेला आहे. मात्र भविष्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बटाटा सुद्धा येत्या काळात महागण्याची शक्यता आहे.सध्या भाजीपाल्याच्या किमतीत चढ-उतार सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बाजार पेठेत भाजीपाल्याची आवक फारशी नाही. त्यामुळे सध्या काही प्रमाणात भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.- गणेश मेश्राम, भाजी विक्रेता