शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला खरेदीदारांचा खरेदीवर बहिष्कार!

By admin | Updated: July 21, 2016 23:49 IST

चिखली येथे बाजार समिती व ‘स्वाभिमानी’च्या पुढाकाराने थेट बाजारात विक्री.

चिखली (जि. बुलडाणा) : शासनाने फळे, भाजीपाला व मसाल्याचे पदार्थ नियमनमुक्त करून अडतमुक्तीचा निर्णय घेतला असल्याने इतके दिवस शेतकर्‍यांच्या मालाला मनमानी भाव देऊन अडत वसूल करणार्‍यांना हा निर्णय चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्याचे पडसाद २१ जुलै रोजी चिखली बाजार समितीच्या यार्डात दिसून आले. मार्केट यार्डातील सर्व खरेदीदारांनी संघटितपणे भाजीपाला खरेदीवर बहिष्कार टाकून शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, ऐनवेळी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी बाजार समिती प्रशासन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते धावून गेल्याने शेतकर्‍यांचा माल खरेदीदारांविना विकल्या गेला. या माध्यमातून शेतकर्‍यांना चांगला भाव तर मिळालाच उलटपक्षी खरेदीदारांनाही तोंडघशी पडावे लागले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रणाखाली चालत असलेल्या भाजीबाजारामध्ये आजवर अडत्यांद्वारे शेतकर्‍यांकडून भाजीपाला, फळे व मसाल्याच्या वस्तूंवर १0 टक्के अडत घेतली जात होती. यातून शेतकर्‍यांची मुक्तता करण्यासाठी शासनाने फळे, भाजीपाला नियमन मुक्त केल्याने खरेदीदारांनी २१ जुलै रोजी येथील मार्केट यार्डात दाखल झालेल्या भाजीपाला व फळे आदी शेतमाल खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला होता. तसेच यामध्ये बाजार समितीने मध्यस्थी करून अडत रद्द करावी, असा सूर खरेदीदारांनी आळवला. यादरम्यान गोंधळ उडाल्याने शेतकर्‍यांकडून तीव्र रोष व्यक्त केल्या जात होता. याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तातडीने बाजार समितीत दाखल झाले. खरेदीदारांनी थेट शेतकर्‍यांकडून माल खरेदी करावा, असा पावित्रा घेतल्याने बाजार समितीनेही पुढाकार घेतला. दरम्यान बाजार समितीने खरेदीदारांनी व्यापार्‍याला केवळ सहा टक्के अडत देण्याची मुभा दिली. तोडगा न निघाल्याने अखेर बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील यांनी समितीच्या कर्मचार्‍यांमार्फत शेतकर्‍यांचा माल थेट बाजारात विक्रीसाठी पाठवून स्वाभिमानी व बाजार समितीच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने थेट बाजारात हा माल विकल्या गेला. सभापती विष्णू पाटील व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी खरेदीदारांना न जुमानता शेतकर्‍यांसाठी पुढाकार घेतल्याने थेट बाजारात गेलेल्या शेतमालाला चांगला भावदेखील मिळाला.