शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

वरुणराजाने पाठ फिरविल्यामुळे पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST

चिखली : यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पावसाची अपेक्षा होती. तथापि तसे अंदाजही वर्तविले जात होते. मात्र, अवकाळी वगळता चिखली ...

चिखली : यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पावसाची अपेक्षा होती. तथापि तसे अंदाजही वर्तविले जात होते. मात्र, अवकाळी वगळता चिखली तालुक्याला अद्यापही मृग नक्षत्रातील दमदार व सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या लहरीपणामुळे सुमारे ९८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. सोबतच पावसाबाबत सकारात्मक संकेत नसल्याने चिंतेचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

तालुक्यात २९ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सार्वत्रिक पाऊस झाला नाही. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेले. त्यातच मान्सून आठ दिवस लांबल्याचे चित्र आहे. दिवसा कडक ऊन तर रात्री आकाशात चांदणे दिसते. अचानक पावसाचे वातावरण तयार होते. मात्र पाऊस पडत नाही.

मृग नक्षत्रात तालुक्यात पावसाची संततधार अपेक्षित होती. मात्र पडणारा पाऊसही विखरून पडत आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला. तेथील शेतकरी सुखावतो तर बाकीच्यांना प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यातील सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा खरिपाचा पेरा अपेक्षित आहे. यातील ६९ हजार हेक्टर सोयाबीन खालील क्षेत्र आहे. यासह ११ हजार ५०० हेक्टर तूर, ३ हजार ८०० हेक्टरवर उडीद, २ हजार ४०० हेक्टर मुगाचे क्षेत्र आहे. त्या अनुषंगाने मशागत करून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली. बियाणे, खतांची जुळवाजुळव केली. मात्र पावसाने सध्या डोळे वटारलेले आहेत.

तालुक्यातील काही मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने सुमारे २५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. पेरणीचे हे क्षेत्र एकूण लागवड क्षेत्रापैकी कमी प्रमाणात असले तरी आता ऐनवेळी पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे.

--१९ मिमी पावसाची नोंद--

तालुक्यात सरासरी ७८६ मिमी पाऊस पडतो. मात्र १६ जून पर्यंत १९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पडलेला पाऊस हा विखुरलेल्या स्वरुपात पडला. सद्यस्थितीत अमडापूर, हातणी-मालगणी, शेलगाव जहाँगीर या भागात समाधानकारक पाऊस पडला आहे.

पेरणीची अति घाई नकोच !

कृषी विभागाच्या या जनजागृतीने अनेक शेतकऱ्यांनी सबुरी राखली आहे. मात्र, तालुक्यातील काही मंडळात पुरेसा पाऊस होताच पेरण्या उरकण्याची घाई करण्यात आली आहे. यातील काही भागातील शेतकऱ्यांना तुरळक प्रमाणात १६ जून रोजी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात संततधार पाऊस गरजेचा आहे. अपुरा ओलावा व पेरणीनंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

(अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, चिखली)