शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाने पाठ फिरविल्यामुळे पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST

चिखली : यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पावसाची अपेक्षा होती. तथापि तसे अंदाजही वर्तविले जात होते. मात्र, अवकाळी वगळता चिखली ...

चिखली : यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पावसाची अपेक्षा होती. तथापि तसे अंदाजही वर्तविले जात होते. मात्र, अवकाळी वगळता चिखली तालुक्याला अद्यापही मृग नक्षत्रातील दमदार व सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या लहरीपणामुळे सुमारे ९८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. सोबतच पावसाबाबत सकारात्मक संकेत नसल्याने चिंतेचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

तालुक्यात २९ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सार्वत्रिक पाऊस झाला नाही. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेले. त्यातच मान्सून आठ दिवस लांबल्याचे चित्र आहे. दिवसा कडक ऊन तर रात्री आकाशात चांदणे दिसते. अचानक पावसाचे वातावरण तयार होते. मात्र पाऊस पडत नाही.

मृग नक्षत्रात तालुक्यात पावसाची संततधार अपेक्षित होती. मात्र पडणारा पाऊसही विखरून पडत आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला. तेथील शेतकरी सुखावतो तर बाकीच्यांना प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यातील सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा खरिपाचा पेरा अपेक्षित आहे. यातील ६९ हजार हेक्टर सोयाबीन खालील क्षेत्र आहे. यासह ११ हजार ५०० हेक्टर तूर, ३ हजार ८०० हेक्टरवर उडीद, २ हजार ४०० हेक्टर मुगाचे क्षेत्र आहे. त्या अनुषंगाने मशागत करून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली. बियाणे, खतांची जुळवाजुळव केली. मात्र पावसाने सध्या डोळे वटारलेले आहेत.

तालुक्यातील काही मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने सुमारे २५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. पेरणीचे हे क्षेत्र एकूण लागवड क्षेत्रापैकी कमी प्रमाणात असले तरी आता ऐनवेळी पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे.

--१९ मिमी पावसाची नोंद--

तालुक्यात सरासरी ७८६ मिमी पाऊस पडतो. मात्र १६ जून पर्यंत १९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पडलेला पाऊस हा विखुरलेल्या स्वरुपात पडला. सद्यस्थितीत अमडापूर, हातणी-मालगणी, शेलगाव जहाँगीर या भागात समाधानकारक पाऊस पडला आहे.

पेरणीची अति घाई नकोच !

कृषी विभागाच्या या जनजागृतीने अनेक शेतकऱ्यांनी सबुरी राखली आहे. मात्र, तालुक्यातील काही मंडळात पुरेसा पाऊस होताच पेरण्या उरकण्याची घाई करण्यात आली आहे. यातील काही भागातील शेतकऱ्यांना तुरळक प्रमाणात १६ जून रोजी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात संततधार पाऊस गरजेचा आहे. अपुरा ओलावा व पेरणीनंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

(अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, चिखली)