शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांच्या हर्राशी परिसरात विविध समस्या

By admin | Updated: August 11, 2014 22:48 IST

शहरातील हर्राशीत कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पालेभाज्यांच्या विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यासह हमाल आणि भाजी विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

खामगाव: शहरातील हर्राशीत कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पालेभाज्यांच्या विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यासह हमाल आणि भाजी विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हर्राशीतील विविध समस्या निकाली काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्‍यांची आहे. खामगाव शहरात भाजीपाल्याची आवक प्रामुख्याने रात्री होते. तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी येथे भाजी विक्रीसाठी येतात. रात्री ८ वाजतापासून याठिकाणी बाहेरगावचे शेतकरी भाजीव्रिकीसाठी येतात. हर्राशी पहाटे साडेतीन-चार वाजता सुरू होत असली तरी हर्राशीत शेतमाल रात्रीच येतो. यासाठी शेकडो शेतकरी, हमाल रात्रीच हर्राशीत राहतात. रात्री १0 वाजता नंतर शहरातील हॉटेल, चहा टपर्‍या सुरू राहत नाहीत. त्यामुळे बाहेरगावच्या शेतकर्‍यासह हमालांना हर्राशीत रात्री उपाशी झोपण्याची वेळ येते. रात्रीच्यावेळी रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन सुरू ठेवण्याची परवानगी आहे. परंतु, हे कॅन्टीन दूर पडते. शिवाय कॅन्टीनवर अथवा हर्राशीपासून दूर असलेल्या धाब्यावर चहा, नास्ता आणि जेवायचे म्हटल्यास शेतमाल चोरी जाण्याची भिती असते. त्यामुळे अनेक शेतकरी उपाशीपोटी झोपणे पसंत करीत असल्याचे चित्र आहे. शेतकरी आणि हमालांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी पांडुरंग मिसाळ, श्रीराम राऊत, युवराज भेरडे, संतोष बावणे, राजू मदारीवाले, गजानन रोहणकार, दिलीप तायडे, बळीराम इंगळे यांनी केली आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक हर्राशी बाजार परिसरात आहे. त्यामुळे दिवसभर शेतातील माल काढून हर्राशीसाठी भाजीपाला आणताना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच रात्री हर्राशी परिसरात थांबून मालाचे रक्षण करण्यासाठी रात्री जागरण करावे लागतो. त्यामुळे अनेकांना त्रास होत असतो.

** बाजार समितीचा आदर्श घ्यावा

कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने केवळ एक रुपयांमध्ये उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र, शहरातील हर्राशीत पालिका प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नाही. शहरातील रेल्वे स्थानकावर चहा आणि नास्त्याची व्यवस्था आहे. परंतु, हर्राशीत मालाची चोरी होत असल्याने दूरवर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना उपाशी पोटी झोपण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. इतर कुठलिही व्यवस्था नसल्याने शेतकरी व हमालांना त्रास होतो.