शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांच्या हर्राशी परिसरात विविध समस्या

By admin | Updated: August 11, 2014 22:48 IST

शहरातील हर्राशीत कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पालेभाज्यांच्या विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यासह हमाल आणि भाजी विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

खामगाव: शहरातील हर्राशीत कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पालेभाज्यांच्या विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यासह हमाल आणि भाजी विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हर्राशीतील विविध समस्या निकाली काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्‍यांची आहे. खामगाव शहरात भाजीपाल्याची आवक प्रामुख्याने रात्री होते. तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी येथे भाजी विक्रीसाठी येतात. रात्री ८ वाजतापासून याठिकाणी बाहेरगावचे शेतकरी भाजीव्रिकीसाठी येतात. हर्राशी पहाटे साडेतीन-चार वाजता सुरू होत असली तरी हर्राशीत शेतमाल रात्रीच येतो. यासाठी शेकडो शेतकरी, हमाल रात्रीच हर्राशीत राहतात. रात्री १0 वाजता नंतर शहरातील हॉटेल, चहा टपर्‍या सुरू राहत नाहीत. त्यामुळे बाहेरगावच्या शेतकर्‍यासह हमालांना हर्राशीत रात्री उपाशी झोपण्याची वेळ येते. रात्रीच्यावेळी रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन सुरू ठेवण्याची परवानगी आहे. परंतु, हे कॅन्टीन दूर पडते. शिवाय कॅन्टीनवर अथवा हर्राशीपासून दूर असलेल्या धाब्यावर चहा, नास्ता आणि जेवायचे म्हटल्यास शेतमाल चोरी जाण्याची भिती असते. त्यामुळे अनेक शेतकरी उपाशीपोटी झोपणे पसंत करीत असल्याचे चित्र आहे. शेतकरी आणि हमालांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी पांडुरंग मिसाळ, श्रीराम राऊत, युवराज भेरडे, संतोष बावणे, राजू मदारीवाले, गजानन रोहणकार, दिलीप तायडे, बळीराम इंगळे यांनी केली आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक हर्राशी बाजार परिसरात आहे. त्यामुळे दिवसभर शेतातील माल काढून हर्राशीसाठी भाजीपाला आणताना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच रात्री हर्राशी परिसरात थांबून मालाचे रक्षण करण्यासाठी रात्री जागरण करावे लागतो. त्यामुळे अनेकांना त्रास होत असतो.

** बाजार समितीचा आदर्श घ्यावा

कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने केवळ एक रुपयांमध्ये उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र, शहरातील हर्राशीत पालिका प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नाही. शहरातील रेल्वे स्थानकावर चहा आणि नास्त्याची व्यवस्था आहे. परंतु, हर्राशीत मालाची चोरी होत असल्याने दूरवर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना उपाशी पोटी झोपण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. इतर कुठलिही व्यवस्था नसल्याने शेतकरी व हमालांना त्रास होतो.