शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

वनग्राम देव्हारी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:33 IST

हा निधी मंजूर होऊन येथील २९८ कुटुंबाचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे यश त्यामुळे खा. प्रतापराव जाधव आणि ...

हा निधी मंजूर होऊन येथील २९८ कुटुंबाचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे यश त्यामुळे खा. प्रतापराव जाधव आणि आ. संजय गायकवाड यांना मिळाले आहे. यासाठी आ. संजय गायकवाड यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने प्रस्तावही पाठविण्यात आला होता. त्यास अखेर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे देव्हारी गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यातील मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर कमी होऊन या अभयारण्याच्या संवर्धनास मोठा हातभार लागण्यास मदत होणार आहे विशेष म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्यात मधल्या काळात टी१ सी१ वाघाचे अस्तित्व असल्याने हे ज्ञानगंगा अभयारण्य एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र हे २० हजार ५२१ हेक्टर आहे. या अभयारण्यात ११८ प्रजातीच्या वनस्पती आणि प्राणी आहेत. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत या अभयारण्याचे संवर्धन हे काळाची गरज बनली आहे. या अभयारण्यात देव्हारी गावात २९८ कुटुंब वास्तव्यास असून त्यापैकी ४८ शेतकरी आहेत. त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी हे प्रयत्न चालवले होते. ३ मार्च रोजी पाठपुराव्यांतर्गत आ. संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गावाच्या पुनर्वसनासाठी निधीची मागणी केली होती. त्यास हे यश आले आहे.

--प्रति कुटुंब दहा लाख रुपये--

देव्हारी गावातील प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये मदत राशी दिल्या जाणार आहे. ४८ शेतकऱ्यांना दुय्यम निबंधकांच्या मूल्यांकनाच्या चारपट रक्कम दिली जाणार आहे. २९८ कुटुंबांना २९ कोटी ८० लाख रुपये तर शेती मोबदल्यासाठी २७ कोटी २७ लाख ६७ हजार ८०० रुपये असा हा निधी दिल्या जाईल.