शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

वनग्राम देव्हारी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:33 IST

हा निधी मंजूर होऊन येथील २९८ कुटुंबाचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे यश त्यामुळे खा. प्रतापराव जाधव आणि ...

हा निधी मंजूर होऊन येथील २९८ कुटुंबाचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे यश त्यामुळे खा. प्रतापराव जाधव आणि आ. संजय गायकवाड यांना मिळाले आहे. यासाठी आ. संजय गायकवाड यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने प्रस्तावही पाठविण्यात आला होता. त्यास अखेर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे देव्हारी गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यातील मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर कमी होऊन या अभयारण्याच्या संवर्धनास मोठा हातभार लागण्यास मदत होणार आहे विशेष म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्यात मधल्या काळात टी१ सी१ वाघाचे अस्तित्व असल्याने हे ज्ञानगंगा अभयारण्य एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र हे २० हजार ५२१ हेक्टर आहे. या अभयारण्यात ११८ प्रजातीच्या वनस्पती आणि प्राणी आहेत. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत या अभयारण्याचे संवर्धन हे काळाची गरज बनली आहे. या अभयारण्यात देव्हारी गावात २९८ कुटुंब वास्तव्यास असून त्यापैकी ४८ शेतकरी आहेत. त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी हे प्रयत्न चालवले होते. ३ मार्च रोजी पाठपुराव्यांतर्गत आ. संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गावाच्या पुनर्वसनासाठी निधीची मागणी केली होती. त्यास हे यश आले आहे.

--प्रति कुटुंब दहा लाख रुपये--

देव्हारी गावातील प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये मदत राशी दिल्या जाणार आहे. ४८ शेतकऱ्यांना दुय्यम निबंधकांच्या मूल्यांकनाच्या चारपट रक्कम दिली जाणार आहे. २९८ कुटुंबांना २९ कोटी ८० लाख रुपये तर शेती मोबदल्यासाठी २७ कोटी २७ लाख ६७ हजार ८०० रुपये असा हा निधी दिल्या जाईल.