शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

युरिया खताची कमतरता

By admin | Updated: September 6, 2014 01:01 IST

मातोळा तालुक्यात खताची कमतरतेमुळे कास्तकार अडचणीत.

मोताळा : मागील आठवड्यापासून तालुकाभरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, परिसरातील पिके तरारली आहे. त्यामुळे कापूस, मका व हायब्रिड पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताची मागणी वाढली आहे. मात्र कृषी संचालकांनी युरियाचा तुटवडा असल्याचे कारण देत शेतकर्‍यांची लूट चालविली असल्याची चर्चा शेतकर्‍यांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे. तालुकाभरात पाऊस झाल्यामुळे पिके डौलदार असली तरी, बर्‍याच शेतकर्‍यांच्या शेतात पाण्याचा निचरा न झाल्याने पिके पिवळी पडू लागली आहे. यासाठी युरिया खताची प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र मोताळा शहर व परिसरातील दुकानांमध्ये युरिया शिल्लक नसल्यामुळे व कृषी विभागाकडून उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मात्र दोन ते तीन दिवसांत युरिया मिळेल, असे सांगितले जात आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत २९८ रूपये असतांना छुप्या किमंतीत ४00 रूपयापर्यंंत विकल्या जात असल्याची ओरड शेतकरीवर्गातून होत आहे. मात्र याबाबत तक्रार करण्यास कोणीही समोर येत नाही. मागील काही दिवसांपासून मोताळासह परिसरातील कृषी केंद्रावर युरियाची विचारणा केली असता युरियाचा तुटवडा असल्याचे कारण सांगितल्या जात आहे. मात्र शहरालगतच्या काही गावामध्ये चढय़ा भावाने युरियाची विक्री करून शेतकर्‍यांना वेठीस धरल्या जात असल्याचे शेतकरी सांगत आहे. सर्वत्र युरियाचा तुटवडा असतांना ठरावीक गावामध्ये युरियाचा माल कोठून येतो व तो चढय़ा भावाने कसा विकला जातो हे न उलगडणारे कोडे आहे. परिसरात पावसाची सुरूवात झाल्यामुळे मका व हायब्रिड पिकांना युरिया खताची आवशकता असून, याच वातावरणात पिकांना खत देणे गरजेचे आहे. हे खत स्वस्त असल्यामुळे शेतकर्‍यांची ओढ युरियाकडे असते. मात्र युरियांच्या टंचाईचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. शेतकर्‍यांची लूट होवू नये यासाठी कृषी विभागाने मोहीम अधिकार्‍याकडे याबाबत जबाबदारी दिली आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे सर्वत्र युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.