शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:32 IST

सुलतानपूर : गत ४ दिवसापासून सुलतानपूर परिसरात अवकाळी पाऊस सायंकाळच्या ठरावीक वेळेत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह हजेरी ...

सुलतानपूर : गत ४ दिवसापासून सुलतानपूर परिसरात अवकाळी पाऊस सायंकाळच्या ठरावीक वेळेत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत सुलतानपूर व परिसरातील राजनी, धानोरा, शिवणी पिसा, अंजनी, खळेगाव, सोमठाणा, खापरखेड, कोयाळी , उदनापूर, कारेगाव , वडगाव , पारडी , बोरखेडी , वेणी , येसापूर व भानापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू आणि हरबरा सोंगणीला आला असून मका, ज्वारी, बिजवई कांदा जोमात आहे. परंतु अवकाळी पावसाने या पिकांची अक्षरशः वाट लावल्याने ही पिके जमिनीवर लोळवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे वार्षिक बजेट कोलमडल्याने ते शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहे. यंदा सुलतानपूर मंडळात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांच्या अंतिम आनेवारीचा अहवाल लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी शासनाकडे पाठवला हाेता. मात्र नापिकीची मदत आणि शेतकऱ्यांनी भरलेला हक्काचा विमा मिळणे अपेक्षित असताना विरोधक व सत्ताधारी यांनी चालवलेल्या कुरघोडीच्या राजकारणात या दोन्हींकडून बळीराजाच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.

सुलतानपूर मंडळात अतिवृष्टी होऊन खरीप पिकाची अंतिम आणेवारी ४७ पैशाच्या आत असल्याचा अहवाल वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविलेला आहे.

सैफन नदाफ

तहसीलदार लोणार