शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:32 IST

सुलतानपूर : गत ४ दिवसापासून सुलतानपूर परिसरात अवकाळी पाऊस सायंकाळच्या ठरावीक वेळेत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह हजेरी ...

सुलतानपूर : गत ४ दिवसापासून सुलतानपूर परिसरात अवकाळी पाऊस सायंकाळच्या ठरावीक वेळेत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत सुलतानपूर व परिसरातील राजनी, धानोरा, शिवणी पिसा, अंजनी, खळेगाव, सोमठाणा, खापरखेड, कोयाळी , उदनापूर, कारेगाव , वडगाव , पारडी , बोरखेडी , वेणी , येसापूर व भानापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू आणि हरबरा सोंगणीला आला असून मका, ज्वारी, बिजवई कांदा जोमात आहे. परंतु अवकाळी पावसाने या पिकांची अक्षरशः वाट लावल्याने ही पिके जमिनीवर लोळवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे वार्षिक बजेट कोलमडल्याने ते शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहे. यंदा सुलतानपूर मंडळात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांच्या अंतिम आनेवारीचा अहवाल लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी शासनाकडे पाठवला हाेता. मात्र नापिकीची मदत आणि शेतकऱ्यांनी भरलेला हक्काचा विमा मिळणे अपेक्षित असताना विरोधक व सत्ताधारी यांनी चालवलेल्या कुरघोडीच्या राजकारणात या दोन्हींकडून बळीराजाच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.

सुलतानपूर मंडळात अतिवृष्टी होऊन खरीप पिकाची अंतिम आणेवारी ४७ पैशाच्या आत असल्याचा अहवाल वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविलेला आहे.

सैफन नदाफ

तहसीलदार लोणार