शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

केंद्रीय अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:39 IST

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केेलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा ...

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केेलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात गावे, गरीब शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक, उद्योजक या सर्वांचा विचार करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी दिली.

ते बुलडाणा येथे १८ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार विजयराज शिंदे, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, सरचिटणीस प्रभाकर वारे, आशिष व्यवहारे, हर्षल जोशी, रघुनाथ खेर्डे उपस्थित होते. मोदी सरकारच्या २०२१-२२च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहन, संरक्षणपासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनविण्याचा एक सुदृढ पायादेखील समाविष्ट करण्यात आला असल्याचे पेशकार यांनी सांगितले. हा सर्वांचा अर्थसंकल्प आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. भारतालाही त्याचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आर्थिक स्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी नवे कर लावणे स्वाभाविक होतेे. मात्र, या अर्थसंकल्पात करांमध्ये काहीही वाढ करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पातील आरोग्यविषयक तरतुदीत गेल्यावर्षीच्या तुलनेत १३७ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, ही तरतूद ९४ हजार कोटी रूपयांवरून २.३८ लाख कोटी रूपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. ‘कोविड १९’साठी तयार करण्यात आलेल्या लसीसाठी वर्ष २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ३५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये पोषणविषयक उत्तम परिणाम देणारी धोरणे राबविण्याची योजना आखली जाणार असल्याचे पेशकार यांनी सांगितले.