शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

महामार्गावरील झाडे लावण्याच्या तरतुदीकडे अक्षम्य दुर्लक्ष!

By admin | Updated: April 18, 2017 01:02 IST

मलकापूर- गेल्या चार ते पाच वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यात मलकापूर ते अकोला दरम्यान हजारो झाडे तोडली गेलीत.

हनुमान जगताप - मलकापूरगेल्या चार ते पाच वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यात मलकापूर ते अकोला दरम्यान हजारो झाडे तोडली गेलीत. अर्थात झाडे पुन्हा लावण्याची तरतूद निविदेत असल्याची माहिती आहे; मात्र त्यासंदर्भात हालचाली नाहीत. दुसरीकडे कमाल तापमानामुळे पर्यावण संतुलन बिघडल्याने त्या झाडांच्या लागवडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पर्यावरणप्रेमी त्यासंबधी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.केंद्र शासनाच्या दळणवळण व वाहतूक विभागाच्या अखत्यारित राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाची सुरुवात झाली आहे. किमान तीन ते चार वर्षात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपेक्षित होते; मात्र भूसंपादन व निविदा याखेरीज लाभार्थ्यांच्या लाभाचा प्रश्न अशा विविध कारणावरुन रखडत पडलेले महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली पाच वर्षे मजल दरमजल स्वरुपात सुरू आहे.एकीकडे महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाचे विविध अडचणी आल्या मात्र रस्त्यालगतच्या झाडांची कटाई मात्र जोमात झाल्याच सर्वश्रृत आहे. त्याच धरतीवर अकोला विभागात अकोला, बाळापूर, खामगाव, नांदुरा व मलकापूर या तालुक्यातर्गत मोडणाऱ्या महामार्ग ६ च्या शेजारील हजारो झाडांची कटाई मात्र निर्धारित वेळेतच झाल्याचे दिसते. महामार्गाचे चौपदरीकरण करताना लगतच्या भागात झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे आदी बाबी कामाच्या निविदेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे झाडांची लागवड व संगोपन संबंधी कंपनी करणार, ही बाब अपेक्षित आहे; मात्र सध्या तरी त्यासंबंधीच्या हालचाली दिसत नाहीत. किब्ांहुना महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामच मुळात या ना त्या कारणावरुन अडगळीत पडल्याने अशात वृक्ष लागवडीचा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत राहतो.दरम्यान, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कमाल तापमान ४४ पर्यंत पोहोचल्याने पर्यावरण संतुलन बिघडल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत महामार्गाच्या निर्मितीसाठी रस्त्यालगतच्या तोडण्यात आलेल्या ‘त्या’ हजारो झाडांच्या लागवडीचा त्यांच्या संवर्धनाचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.यासबंधी केंद्र शासनाच्या वाहतूक व दळणवळण विभागाकडे पुराव्याची तयारी स्थानीय पर्यावरण प्रेमी व समाजिक यांनी चालविल्याची माहिती आहे. कारण महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास निर्धारित वेळेपेक्षा जास्त अवधी जातो म्हटल्यावर ‘त्या’ हजारो झाडांच्या लागवडीसंबंधी पर्यावरण प्रेमी चिंता व्यक्त करताना दिसत असून तुर्तास ‘त्या’ झाडांच्या कटाईचा मलकापूर ते अकोला दरम्यानच्या पर्यावरणावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट होते. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावाराष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणात मलकापूर ते अकोला दरम्यान हजारो झाडांच्या कटाईमुळे पर्यावरण संतुलनावर परिणाम होत आहे. त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी रस्त्यालगत निवीदेत नमुद झाडांची लागवड व संगोपन यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज प्रतिपादीत होत असून सुदैवाने केंद्राचे वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी विदर्भातीलच आहेत त्यामुळे या कामी यश येवू शकते.