शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेराेजगारी, व्यसन, विवाहबाह्य संबधांमुळे वाढला काैटुंबिक कलह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST

बुलडाणा : बेराेजगारी, व्यसन आणि विवाहबाह्य संबंधांमुळे काैटुंबिक कलह वाढल्याचे चित्र आहे. तसेच एप्रिल २०२० ते डिसेंबर दरम्यान लावण्यात ...

बुलडाणा : बेराेजगारी, व्यसन आणि विवाहबाह्य संबंधांमुळे काैटुंबिक कलह वाढल्याचे चित्र आहे. तसेच एप्रिल २०२० ते डिसेंबर दरम्यान लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचा राेजगार गेला. त्यामुळेही काही प्रमाणात वाद वाढले आहेत. भराेसा सेलमध्ये जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान ४४६ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

गत काही वर्षांपासून विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे, पती, पत्नीवर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा दबावच राहिला नाही. त्यामुळे विवाहबाह्य संबध वाढले आहेत. आधी या बाबी लपवून ठेवल्या जात हाेत्या. मात्र, आता उघडपणे संबध पती किंवा पत्नी सांगण्यात येत आहेत. त्यामुळे काैटुंबिक कलहाचे हे कारण ठरत आहे. तसेच लाॅकडाऊनमुळे अनेकांचा राेजगार गेला. अनेक जण घरीच राहत असल्याने हिंसाचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. पती, पत्नींमध्ये अहंकार आल्याने कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याने वाद वाढतच जातात. क्षुल्लक कारणावरून घटस्फाेटापर्यंत प्रकरणे जात असल्याचे समाेर आले आहे. सन २०२० मध्ये भराेसा सेलमध्ये एकूण ४४६ प्रकरणे दाखल झाली हाेती. त्यापैकी १२६ प्रकरणे आपसात करण्यात भराेसा सेलला यश आले आहे. तसेच सन २०१९ मध्ये एकूण ३३६ तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. त्यापैकी ८४ प्रकरणे आपसात करण्यात आली. तसेच काैटुंबिक हिंसाचार आणि काेर्ट समन्सच्या ६९ तक्रारी हाेत्या. २०१९ मध्ये ३३३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तीन प्रकरणांची चाैकशी सुरू आहे. सन २०२१ मध्येही दाेन महिन्यांतच ९४ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

ही आहेत कारणे

पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबध, पती व्यसनाधीन असणे, पतीने दुसरे लग्न करणे आदींसारख्या कारणांमुळे काैटुंबिक कलह वाढले आहेत. अहंकार वाढल्याने पती, पत्नी चूक मान्य करायला तयारच नसतात. त्यामुळे, वाद वाढतच जाताे. काही प्रकरणांमध्ये पत्नी किंवा पतीच्या नाेतवाइकांचा अवास्तव हस्तक्षेपही वादास कारणीभूत ठरत आहे. विवाहाच्या वाढत्या वयामुळे आहे त्या परिस्थितीबराेबर जुळवून घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेही वाद वाढत आहेत.

१२६ प्रकरणे आपसात

सन २०२० भराेसा सेलमध्ये ४४६ तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. त्यापैकी १२६ प्रकरणांमध्ये पती, पत्नींमध्ये आपसात करून भराेसा सेलने निपटारा केला आहे. तसेच वर्षभरात ३८६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. २०१९ मध्ये ३३६ प्रकरणे दाखल झाली हाेती. ८४ प्रकरणे आपसात करण्यात आली. वर्षभरात ३३३ प्रकरणांचा निपटार करण्यात आला आहे. भराेसा सेलप्रमुख एपीआय अलका निकाळजे, हेकाँ अलका वाघमारे, किरण साबळे यांनी प्रकरणे आपसात करण्यासाठी परिश्रम घेतले.

बेराेजगारी, व्यसन,विवाहबाह्य संबंधामुळे काैटुंबिक कलह वाढले आहेत. नाेतवाइकांचा संसारात हस्तक्षेप, दुसरे लग्न, अहंकार आदींमुळेही वाद वाढत आहेत. गेल्या वर्षी १२६ प्रकरणे आपसात केली आहेत. तसेच ३८६ प्रकरणांचा भराेसा सेलने निपटारा केला आहे. लाॅकडाऊनमुळे बुलडाणा जिल्ह्यात काैटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढलेल्या नाहीत. दरवर्षीप्रमाणेच तक्रारी दाखल झाल्या आहेत.

अलका निकाळजे, भराेसा सेल प्रमुख, बुलडाणा