शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दिव्यांग कर्मचाऱ्यांना मागितले लाभ न घेण्याचे हमीपत्र!

By admin | Updated: May 25, 2017 00:54 IST

चिखलीमधील ४०, बुलडाण्यातील चार जणांचा समावेश!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाच्यावतीने दिव्यांगांना दिला जाणारा कोणताही लाभ घेणार नाही, असे हमीपत्र लिहून देण्याचा आदेश जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध विभागांना दिला आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी सदर आदेश आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना दिला. जिल्हाभरात शिक्षकांसह कर्मचारी आम्ही दिव्यंगत्वाचा कोणताही लाभ घेणार नाही, असे हमीपत्र लिहून देत आहेत. चिखली तालुक्यात ४० जणांनी, तर बुलडाणा तालुक्यात चार जणांनी आम्ही दिव्यांग असल्याचा कोणताही लाभ घेणार नाही, असे हमीपत्र लिहून दिले आहे. तसेच यामध्ये तालुक्या-तालुक्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता बोगस दिव्यांग प्रमाणपत्र अनेक कर्मचाऱ्यांनी मिळविले आहेत. गत काही वर्षांपासून या प्रमाणपत्रांचा लाभ घेण्यात येत आहे. यामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत आहे. तसेच दिव्यांगाचे प्रमाणपत्र न मिळविलेल्या कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. बोगस प्रमाणपत्र घेऊन अनेक कर्मचारी दहा ते बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत. दिव्यांग असल्यामुळे त्यांची बदली होत नाही. त्यामुळे ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतले नाही, अशा कर्मचाऱ्यांच्या ग्रामीण भागात बदल्या होत आहेत. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेकदा याबाबत तक्रारी केल्या मात्र, त्यांची दखल घेण्यात आली नाही. याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिव्यांग प्रमाणपत्रावर आधारित सर्व शासकीय लाभ /सवलती ज्याप्रमाणे वाहन भत्ता, व्यवसाय कर, आयकर बदली, पदोन्नती ई. बाबीचा लाभ घ्यावयाचा नसल्यास तसे लेखी हमीपत्र कार्यालयात सादर करण्याचा आदेश दिला. कर्मचाऱ्यांनी लाभ न घेण्याविषयीचे हमीपत्र सादर केल्यास तशी नोंद सेवापुस्तकात घेण्यात येईल व यापूर्वी घेतलेल्या सवलती/लाभ याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तथापि उपरोक्त लाभ/सवलतींचा लाभ घ्यावयाचा असल्यास आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना स्वतंत्र अर्ज करावा, असेही बजावण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या अर्जाला मुकाअ यांची मान्यता मिळाल्यानंतरच उपरोक्त लाभ देण्यात येणार आहे.आणखी वाढ होणार! जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील उच्चश्रेणी मुख्याध्यापक, शिक्षक, पदवीधर शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना दिव्यांग नसतानाही प्रमाणपत्र मिळविले असेल, तर त्याचा कोणताही लाभ घेणार नाही, असे हमीपत्र लिहून देण्याचे सांगितले आहे. त्यानुसार जिल्हाभरात शिक्षक आम्ही लाभ घेणार नाही, असे लिहून देत आहेत. चिखली पंचायत समितीतील आतापर्यंत ४० शिक्षकांनी, तर बुलडाणा तालुक्यातील चार शिक्षकांनी आम्ही दिव्यांगत्वाचा लाभ घेणार नाही, असे लिहून दिले आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.