शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गावात पसरली अस्वच्छता, चिखलात बसून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

गावातील अनेक भागांतील नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या असून, ते घाण पाणी रस्त्यावर वाहताना बघावयास मिळते. काही वार्डात कचरा अस्ताव्यस्त ...

गावातील अनेक भागांतील नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या असून, ते घाण पाणी रस्त्यावर वाहताना बघावयास मिळते. काही वार्डात कचरा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे. गाव स्वच्छतेवर भर असल्याची ओरड करत, स्थानिक गावकऱ्यांनी वारंवार ग्रामसेविकेला विनवणी केली असता, या विनंतीला त्यांनी केराची टोपली दाखविली आहे. वाकी गावामध्ये येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत गटार घाणीने होते व याच ठिकाणाहून गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन गेलेली आहे. त्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी वॉल आहेत. त्यामध्ये पाणी लीक होते आणि तेच पाणी गावाला पिण्यासाठी सोडले जाते. हे पाणी दूषित असल्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात साथरोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यात ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने नागरिकांना मूलभूत सोईसुविधा पुरवणे गरजेचे असताना, ग्रामपंचायत व ग्रामसेवकांच्या उदासीन धोरणामुळे गावकऱ्यांना वेठीस त्यांच्या जीवाशी खेळ होत आहे. ग्रामपंचायतील स्वच्छतेसाठी निधी तर मिळतो. मात्र, तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो, हे गावातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी गावकरी करत आहे.

आंदोलनाचा इशारा

गावाच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अकार्यक्षम प्रशासनाविरोधात ग्रामस्थांच्या भावना तीव्र बनल्या आहेत. वेळीच ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक रहिवासींनी दिला आहे.