शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

पिण्याचे पाणी शुद्ध असेल, तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेकडे सर्वजण लक्ष देतात. अगोदरच कोरोनासारख्या महामारीने लोकांचे जीवन ...

पिण्याचे पाणी शुद्ध असेल, तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेकडे सर्वजण लक्ष देतात. अगोदरच कोरोनासारख्या महामारीने लोकांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यात अंजनी बु. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत साचलेली घाण नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. ग्रामपंचायतला वेळोवेळी सांगूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ३ एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते समाधान पदमने, माधव शेवाळे, राम राऊत, गजानन नागोलकर, ओम ढोले, दिलीप आल्हाट, विष्णू ढोले, शंकर पायघन, सतीश पायघन, भागवत सावसुंदर, चंद्रभान जाधव, उत्तम मोरे, प्रकाश पायघन, सतीश लाड, हनुमान चंदनशिव, अरुण भोसले व इतर यांनी प्रत्यक्ष पाण्याच्या टाकीत उतरून पाहणी केली. त्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी येत असून काही पक्षी पिण्याच्या पाण्यात मृतावस्थेत आढळले. अशा प्रकारचे पाणी कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांना नाईलाजाने प्यावे लागतं आहे. त्यामुळे लहान मुलांना व वयोवृद्ध तसेच सर्वच लोकांना यापासून आरोग्यास मोठा धोका आहे, असेच जर कायम सुरू राहिले तर गावकऱ्यांना अनेक आजारांना आमंत्रण द्यावेे लागेल. हे लोकं कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळत होते, हा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.

ग्रामस्थ झाले आक्रमक

या ठिकाणी ग्रामपंचायतने याकडे प्रथम प्राधान्य देऊन लक्ष देऊन पुढील साफसफाई करणे आवश्यक आहे. या विषयावर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायतला स्वच्छतेसाठी आदेश द्यावे, यानंतर जर पिण्याच्या पाण्यापासून गावातील कोणत्याही व्यक्तीस वा जीवितास धोका निर्माण झाल्यास यास सर्वस्वी ग्रामपंचायत कार्यालयात अंजनी बु. अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशाराही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.