शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

पिण्याचे पाणी शुद्ध असेल, तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेकडे सर्वजण लक्ष देतात. अगोदरच कोरोनासारख्या महामारीने लोकांचे जीवन ...

पिण्याचे पाणी शुद्ध असेल, तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेकडे सर्वजण लक्ष देतात. अगोदरच कोरोनासारख्या महामारीने लोकांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यात अंजनी बु. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत साचलेली घाण नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. ग्रामपंचायतला वेळोवेळी सांगूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ३ एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते समाधान पदमने, माधव शेवाळे, राम राऊत, गजानन नागोलकर, ओम ढोले, दिलीप आल्हाट, विष्णू ढोले, शंकर पायघन, सतीश पायघन, भागवत सावसुंदर, चंद्रभान जाधव, उत्तम मोरे, प्रकाश पायघन, सतीश लाड, हनुमान चंदनशिव, अरुण भोसले व इतर यांनी प्रत्यक्ष पाण्याच्या टाकीत उतरून पाहणी केली. त्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी येत असून काही पक्षी पिण्याच्या पाण्यात मृतावस्थेत आढळले. अशा प्रकारचे पाणी कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांना नाईलाजाने प्यावे लागतं आहे. त्यामुळे लहान मुलांना व वयोवृद्ध तसेच सर्वच लोकांना यापासून आरोग्यास मोठा धोका आहे, असेच जर कायम सुरू राहिले तर गावकऱ्यांना अनेक आजारांना आमंत्रण द्यावेे लागेल. हे लोकं कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळत होते, हा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.

ग्रामस्थ झाले आक्रमक

या ठिकाणी ग्रामपंचायतने याकडे प्रथम प्राधान्य देऊन लक्ष देऊन पुढील साफसफाई करणे आवश्यक आहे. या विषयावर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायतला स्वच्छतेसाठी आदेश द्यावे, यानंतर जर पिण्याच्या पाण्यापासून गावातील कोणत्याही व्यक्तीस वा जीवितास धोका निर्माण झाल्यास यास सर्वस्वी ग्रामपंचायत कार्यालयात अंजनी बु. अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशाराही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.