शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

दहावी, बारावीच्या निकालाबाबत अनिश्चितता कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:29 IST

तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षक व समीक्षकांकडेच पडून आहेत.

- नानासाहेब कांडलकर लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. बारावी व दहावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षक व समीक्षकांकडेच पडून आहेत.कोरोणाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउनची स्थिती निर्माण झाल्याने याबाबत शिक्षण मंडळाकडून पुढील कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. दरवर्षी साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात बारावी परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाकडून जाहीर केल्या जातो. मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावी परीक्षेचा निकाल घोषित होतो. परंतु यावर्षी बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर इंग्रजी व मराठी या विषयाच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका समीक्षकांनी शिक्षण मंडळाकडे सादर केल्यात. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउनची घोषणा झाली आणि बारावीच्या इतर विषयांच्या उत्तर पत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षकांना समीक्षकांकडे पोहोचविता आल्या नाहीत. समीक्षकांना सुद्धा या उत्तर पत्रिका व गुणपत्रिका शिक्षण मंडळाकडे पोहोचविणे अशक्य झाले. त्यामुळे सध्या ह्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रिका समीक्षकांकडे पडून आहेत. दहावीची परीक्षा पूर्ण होण्यापूर्वीच लॉकडाउन झाले. त्यामुळे दहावीच्या उत्तरपत्रिकांची स्थिती सुद्धा बारावी प्रमाणेच आहे.मेडिकल, इंजिनिअरिंगचे प्रवेशही लांबण्याची शक्यताबारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांचे पुढील मेडिकल व इंजिनीअरिंगचे प्रवेश अवलंबून असते; परंतु यावर्षी पुढील शिक्षणाकरीता होणाºया प्रवेश परीक्षाही पुढे ढकलल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.बारावीचा निकाल केव्हा लागणार, मेडिकल व इंजीनियरिंग करिता घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा केव्हा होणार या प्रश्नाचे उत्तर सध्या कुणीही देऊ शकत नसल्याने बारावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आलेल्या संकटाचा सामना करणे हे प्रथम कर्तव्य समजत हा विद्यार्थी वर्ग आपापल्या घरी हे संकट निवारण्याची वाट पाहात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवस