शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुकीचा त्रास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:15 IST

शेगाव : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक सध्या वाहतुकीच्या  विस्कळीत नियोजनामुळे वाहनचालकांसाठी तापदायक ठरत  आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने, काळ्या-पिवळ्या आणि  अँपे चालकांनी शिवाजी चौकातील अकोटकडे जाणारा संपूर्ण  रस्ता ताब्यात घेतल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना त्रास  सहन करावा लागत आहे, तर अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक  परिसर आणि एमएसईबी चौकात खामगावकडे वाहतूक  करणार्‍या वाहनांनी अक्षरश: वेढा घातला आहे. बेशिस्त वाह तुकीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याचे  दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेगाव : सर्वसामान्य नागरिकांसह भाविक मेटाकुटीस

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक सध्या वाहतुकीच्या  विस्कळीत नियोजनामुळे वाहनचालकांसाठी तापदायक ठरत  आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने, काळ्या-पिवळ्या आणि  अँपे चालकांनी शिवाजी चौकातील अकोटकडे जाणारा संपूर्ण  रस्ता ताब्यात घेतल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना त्रास  सहन करावा लागत आहे, तर अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक  परिसर आणि एमएसईबी चौकात खामगावकडे वाहतूक  करणार्‍या वाहनांनी अक्षरश: वेढा घातला आहे. बेशिस्त वाह तुकीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याचे  दिसून येत आहे.शेगाव शहराकडे विदर्भाची पंढरी म्हणून पाहिल्या जाते. यामुळे  या शहरात संत गजानन महाराजांच्या  दर्शनासाठी दररोज हजारो  भक्त  येतात. शहरात प्रमुख मार्ग रेल्वे स्टेशन ते मंदिर हाच  असल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहनांची आणि पायी  चालणार्‍या भक्तांची गर्दी राहते; मात्र मागील तीन महिन्यांपासून  रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौकापयर्ंतचा रस्ता हा ठिकठिकाणी  अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांनी ताब्यात घेतला आहे.  शहरातील चिमाजी चौक हा एकमेव मोठा चौक आहे; मात्र या  चौकात अकोट रोडवर सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ७  वाजेपयर्ंत दहा ते पंधरा प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस् त्याच्या मधोमध उभी राहतात. उल्लेखनीय म्हणजे या चौकात  वाहतूक कर्मचार्‍यांची रेकॉर्डवर ड्युटीही असते; मात्र ही मंडळी  कर्तव्यावर हजर न राहता शहराबाहेरील रस्त्यावर वाहनांची त पासणी करताना आढळतात. अशीच परिस्थिती अग्रसेन महाराज  चौकात राहते. या ठिकाणी टी-पॉईंटवर वाहने उभी केल्या जात  असल्याने  बसस्थानकाकडून येणार्‍या व बसस्थानकात  जाणार्‍या एस टी. चालकांना बस चालविताना तारेवरची कसरत  करावी लागते. रेल्वे स्थानक ते विश्रामगृहाकडे जाणार्‍या  मार्गावर दुभाजक लावण्यात आले आहे. यामध्ये एका मार्गावर  खामगावला प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर उभी राह तात. या ठिकाणीही रेकॉर्डनुसार कर्तव्यावर वाहतूक कर्मचारी  हजर असतात. विश्रामगृहाच्या वळणावर तर भयंकर स्थिती  आहे. ऐन वळणावर काळ्यापिवळ्या उभ्या राहत असल्याने या  ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  बसस्थानक, शाळा नंबर ५ कडे जाणार्‍या रस्त्यावर दोन्ही  बाजूने वाहने उभी राहतात. यामुळे या ठिकाणी वाहतूक  विस्कळीत होण्याच्या घटना दररोजच्या झाल्या आहेत.  एमएसईबी चौकाची स्थितीही काही वेगळी नाही.  परिणामी, या  सर्व ठिकाणी किरकोळ अपघात आणि वाहतूक कोंडीचा  अनुभव घ्यावा लागतो. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे सर्व  प्रकार स्वत:ची यंत्रणा लावून पाहावे व कारवाई करावी, अशी  मागणी होत आहे. 

भररत्यावर दिवसभर अवैध पाकिर्ंग  शहरातील शिवाजी चौक, अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक परिसर  आणि एमएसईबी चौक या परिसरातील  हॉटेल्स, ट्रॅव्हल्स, बी-  बियाणे, दवाखाने आणि विविध कार्यालयांसमोर अनेक वाहने  दिवसभर उभी केली जातात. या अवैध पाकिर्ंगचा  व्यावसायिकांना त्रास असून, अनेक वेळा पोलिसांना हा विषय  सांगितल्या गेला; मात्र वाहतूक विभाग याकडे अर्थपूर्ण  कानाडोळा करीत असल्याचा आरोप होत आहे. 

समान न्याय देण्याची मागणी एकीकडे शहरात ऑटो चालवून शे-दोनशे रुपये कमावून आ पल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणार्‍यांवर कारवाईच्या  नावावर त्यांच्याकडून पैसे उकळल्या जात आहेत. त्यांच्या  बेशिस्त वागणुकीवर कारवाई आवश्यकही आहे; मात्र  दुसरीकडे शहरातून पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध प्रवासी  वाहतूक करणारी वाहने भरचौकात रस्त्याच्या मधोमध उभी  केली जात आहेत. ७ किंवा ९ प्रवासी क्षमता असलेल्या प्रवासी  वाहनांमध्ये आणि अँपेमधून प्रवासी कोंबून वाहतूक सुरु आहे.  या वाहनांची तपासणी किंवा कारवाईसाठी मात्र वाहतूक विभाग  दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.

भाविक-भक्तांनाही त्रास श्रींच्या दर्शनासाठी दूर-दूरवरून वाहनांनी येणार्‍या भक्तांना आता पयर्ंत शहरात पोलिसांकडून कुठलाच त्रास नव्हता; मात्र मागील  तीन महिन्यांपासून कागदपत्रे तपासणीच्या नावाने भक्तांना त्रास  दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात  मध्यप्रदेश येथून वाहनाने आलेल्या भक्तांना नवोदय  विद्यालयाजवळ (ग्रामीण पो.स्टे. च्या हद्दीत) शहर वाहतूक  पोलिसांनी दीड तास अडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस  आला. त्या दाम्पत्याने याबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना  दूरध्वनीवरून माहिती दिली.