शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

बेशिस्त वाहतुकीचा त्रास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:15 IST

शेगाव : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक सध्या वाहतुकीच्या  विस्कळीत नियोजनामुळे वाहनचालकांसाठी तापदायक ठरत  आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने, काळ्या-पिवळ्या आणि  अँपे चालकांनी शिवाजी चौकातील अकोटकडे जाणारा संपूर्ण  रस्ता ताब्यात घेतल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना त्रास  सहन करावा लागत आहे, तर अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक  परिसर आणि एमएसईबी चौकात खामगावकडे वाहतूक  करणार्‍या वाहनांनी अक्षरश: वेढा घातला आहे. बेशिस्त वाह तुकीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याचे  दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेगाव : सर्वसामान्य नागरिकांसह भाविक मेटाकुटीस

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक सध्या वाहतुकीच्या  विस्कळीत नियोजनामुळे वाहनचालकांसाठी तापदायक ठरत  आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने, काळ्या-पिवळ्या आणि  अँपे चालकांनी शिवाजी चौकातील अकोटकडे जाणारा संपूर्ण  रस्ता ताब्यात घेतल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना त्रास  सहन करावा लागत आहे, तर अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक  परिसर आणि एमएसईबी चौकात खामगावकडे वाहतूक  करणार्‍या वाहनांनी अक्षरश: वेढा घातला आहे. बेशिस्त वाह तुकीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याचे  दिसून येत आहे.शेगाव शहराकडे विदर्भाची पंढरी म्हणून पाहिल्या जाते. यामुळे  या शहरात संत गजानन महाराजांच्या  दर्शनासाठी दररोज हजारो  भक्त  येतात. शहरात प्रमुख मार्ग रेल्वे स्टेशन ते मंदिर हाच  असल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहनांची आणि पायी  चालणार्‍या भक्तांची गर्दी राहते; मात्र मागील तीन महिन्यांपासून  रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौकापयर्ंतचा रस्ता हा ठिकठिकाणी  अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांनी ताब्यात घेतला आहे.  शहरातील चिमाजी चौक हा एकमेव मोठा चौक आहे; मात्र या  चौकात अकोट रोडवर सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ७  वाजेपयर्ंत दहा ते पंधरा प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस् त्याच्या मधोमध उभी राहतात. उल्लेखनीय म्हणजे या चौकात  वाहतूक कर्मचार्‍यांची रेकॉर्डवर ड्युटीही असते; मात्र ही मंडळी  कर्तव्यावर हजर न राहता शहराबाहेरील रस्त्यावर वाहनांची त पासणी करताना आढळतात. अशीच परिस्थिती अग्रसेन महाराज  चौकात राहते. या ठिकाणी टी-पॉईंटवर वाहने उभी केल्या जात  असल्याने  बसस्थानकाकडून येणार्‍या व बसस्थानकात  जाणार्‍या एस टी. चालकांना बस चालविताना तारेवरची कसरत  करावी लागते. रेल्वे स्थानक ते विश्रामगृहाकडे जाणार्‍या  मार्गावर दुभाजक लावण्यात आले आहे. यामध्ये एका मार्गावर  खामगावला प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर उभी राह तात. या ठिकाणीही रेकॉर्डनुसार कर्तव्यावर वाहतूक कर्मचारी  हजर असतात. विश्रामगृहाच्या वळणावर तर भयंकर स्थिती  आहे. ऐन वळणावर काळ्यापिवळ्या उभ्या राहत असल्याने या  ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  बसस्थानक, शाळा नंबर ५ कडे जाणार्‍या रस्त्यावर दोन्ही  बाजूने वाहने उभी राहतात. यामुळे या ठिकाणी वाहतूक  विस्कळीत होण्याच्या घटना दररोजच्या झाल्या आहेत.  एमएसईबी चौकाची स्थितीही काही वेगळी नाही.  परिणामी, या  सर्व ठिकाणी किरकोळ अपघात आणि वाहतूक कोंडीचा  अनुभव घ्यावा लागतो. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे सर्व  प्रकार स्वत:ची यंत्रणा लावून पाहावे व कारवाई करावी, अशी  मागणी होत आहे. 

भररत्यावर दिवसभर अवैध पाकिर्ंग  शहरातील शिवाजी चौक, अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक परिसर  आणि एमएसईबी चौक या परिसरातील  हॉटेल्स, ट्रॅव्हल्स, बी-  बियाणे, दवाखाने आणि विविध कार्यालयांसमोर अनेक वाहने  दिवसभर उभी केली जातात. या अवैध पाकिर्ंगचा  व्यावसायिकांना त्रास असून, अनेक वेळा पोलिसांना हा विषय  सांगितल्या गेला; मात्र वाहतूक विभाग याकडे अर्थपूर्ण  कानाडोळा करीत असल्याचा आरोप होत आहे. 

समान न्याय देण्याची मागणी एकीकडे शहरात ऑटो चालवून शे-दोनशे रुपये कमावून आ पल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणार्‍यांवर कारवाईच्या  नावावर त्यांच्याकडून पैसे उकळल्या जात आहेत. त्यांच्या  बेशिस्त वागणुकीवर कारवाई आवश्यकही आहे; मात्र  दुसरीकडे शहरातून पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध प्रवासी  वाहतूक करणारी वाहने भरचौकात रस्त्याच्या मधोमध उभी  केली जात आहेत. ७ किंवा ९ प्रवासी क्षमता असलेल्या प्रवासी  वाहनांमध्ये आणि अँपेमधून प्रवासी कोंबून वाहतूक सुरु आहे.  या वाहनांची तपासणी किंवा कारवाईसाठी मात्र वाहतूक विभाग  दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.

भाविक-भक्तांनाही त्रास श्रींच्या दर्शनासाठी दूर-दूरवरून वाहनांनी येणार्‍या भक्तांना आता पयर्ंत शहरात पोलिसांकडून कुठलाच त्रास नव्हता; मात्र मागील  तीन महिन्यांपासून कागदपत्रे तपासणीच्या नावाने भक्तांना त्रास  दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात  मध्यप्रदेश येथून वाहनाने आलेल्या भक्तांना नवोदय  विद्यालयाजवळ (ग्रामीण पो.स्टे. च्या हद्दीत) शहर वाहतूक  पोलिसांनी दीड तास अडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस  आला. त्या दाम्पत्याने याबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना  दूरध्वनीवरून माहिती दिली.