शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:14 IST

मेहकर: गेल्या काही वर्षांंमध्ये मेहकर तालुक्यावर दरवर्षी दुष्काळाचे सावट पसरत आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे सतत नुकसान होत आहे; परंतु शासनाने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचा मेहकर तालुक्यातील ९0५ शेतकर्‍यांना लाभ मिळाला असून, जवळपास २ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

ठळक मुद्देधडक सिंचन योजनेचा ९00 शेतकर्‍यांना मिळाला लाभ२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: गेल्या काही वर्षांंमध्ये मेहकर तालुक्यावर दरवर्षी दुष्काळाचे सावट पसरत आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे सतत नुकसान होत आहे; परंतु शासनाने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचा मेहकर तालुक्यातील ९0५ शेतकर्‍यांना लाभ मिळाला असून, जवळपास २ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.गेल्या ५ ते ६ वर्षांंपासून मेहकर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. पाऊस कमी पडत असल्याने विहिरी, तलाव, धरण यांची पाण्याची पातळी खालावत आहे. उन्हाळ्यातसुद्धा ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होते. तसेच पिण्याच्या पाण्याचीच टंचाई सर्वाधिक भासत आहे. तर पिकांना देण्यासाठी पाणी कसे मिळणार, शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्याची सोय व्हावी, पिकांचे उत्पन्न वाढून शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी शासनाने २0१२ साली धडक सिंचन विहीर योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत खर्‍या व पात्र लाभार्थींंना लाभ मिळावा, यासाठी खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधित अधिकार्‍यांनी त्यावेळी ग्रामीण भागात सर्व्हे करून १ हजार ८४ शेतकर्‍यांची धडक सिंचन विहीर योजनेत निवड केली होती. त्यावेळी सदर विहीर बांधण्यासाठी शासनाकडून १ लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये ५६५ शेतकर्‍यांनी विहीर पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर १ लाख रुपयात विहिरीचे बांधकाम होत नसल्याने जवळपास १00 विहिरी अर्धवट स्थितीत पडल्या होत्या. या १00 विहिरी नरेगात वर्ग करून पूर्ण करण्यात आल्या. तर २0१५ मध्ये अडीच लाख रुपये अनुदान देऊन १६ विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले होते. तर उर्वरित २२४ विहिरींचे बांधकाम २0१६ ते जून २0१७ पर्यंंत पूर्ण करण्यात आले. खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी आर.पी. पवार, कृषी विस्तार अधिकारी ए.टी. मुळे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ९0५ विहिरी पूर्ण करून जवळपास दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे.