शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:14 IST

मेहकर: गेल्या काही वर्षांंमध्ये मेहकर तालुक्यावर दरवर्षी दुष्काळाचे सावट पसरत आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे सतत नुकसान होत आहे; परंतु शासनाने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचा मेहकर तालुक्यातील ९0५ शेतकर्‍यांना लाभ मिळाला असून, जवळपास २ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

ठळक मुद्देधडक सिंचन योजनेचा ९00 शेतकर्‍यांना मिळाला लाभ२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: गेल्या काही वर्षांंमध्ये मेहकर तालुक्यावर दरवर्षी दुष्काळाचे सावट पसरत आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे सतत नुकसान होत आहे; परंतु शासनाने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचा मेहकर तालुक्यातील ९0५ शेतकर्‍यांना लाभ मिळाला असून, जवळपास २ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.गेल्या ५ ते ६ वर्षांंपासून मेहकर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. पाऊस कमी पडत असल्याने विहिरी, तलाव, धरण यांची पाण्याची पातळी खालावत आहे. उन्हाळ्यातसुद्धा ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होते. तसेच पिण्याच्या पाण्याचीच टंचाई सर्वाधिक भासत आहे. तर पिकांना देण्यासाठी पाणी कसे मिळणार, शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्याची सोय व्हावी, पिकांचे उत्पन्न वाढून शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी शासनाने २0१२ साली धडक सिंचन विहीर योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत खर्‍या व पात्र लाभार्थींंना लाभ मिळावा, यासाठी खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधित अधिकार्‍यांनी त्यावेळी ग्रामीण भागात सर्व्हे करून १ हजार ८४ शेतकर्‍यांची धडक सिंचन विहीर योजनेत निवड केली होती. त्यावेळी सदर विहीर बांधण्यासाठी शासनाकडून १ लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये ५६५ शेतकर्‍यांनी विहीर पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर १ लाख रुपयात विहिरीचे बांधकाम होत नसल्याने जवळपास १00 विहिरी अर्धवट स्थितीत पडल्या होत्या. या १00 विहिरी नरेगात वर्ग करून पूर्ण करण्यात आल्या. तर २0१५ मध्ये अडीच लाख रुपये अनुदान देऊन १६ विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले होते. तर उर्वरित २२४ विहिरींचे बांधकाम २0१६ ते जून २0१७ पर्यंंत पूर्ण करण्यात आले. खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी आर.पी. पवार, कृषी विस्तार अधिकारी ए.टी. मुळे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ९0५ विहिरी पूर्ण करून जवळपास दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे.