शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

दोन अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:36 IST

पहिला अपघात कव्हाळा फाट्यानजीक एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झाला. यात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी ...

पहिला अपघात कव्हाळा फाट्यानजीक एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झाला. यात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी आहे. दुसरा अपघात हा एका मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झाला. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ईसोली येथील दत्तात्रय श्रीराम शेळके (४८) व विष्णू मुरलीधर शेळके (दोघे रा. ईसोली) हे कव्हाळा येथे दुचाकीवर जात असताना शेगाव-पुणे (एमएच-१३-सीयू-६९२७) या बसची दुचाकीला जबर धडक बसली. त्यात दत्तात्रय शेळके हे जागीच ठार झाले तर विष्णू शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती रामभाऊ तुळशीराम शेळके (रा. ईसोली) यांनी दिली.

दरम्यान, दुसरा अपघात उंद्री गावानजीक लालमातीजवळ घडला. उंद्री येथील रहिवासी गोविंद रामराव नसवाले हे लालमातीकडून उंद्रीकडे दुचाकीवर (क्रमांक एमएच-२८ एक्स-६७६६) जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या मालवाहू वाहनाने (क्र. एमएच-२७-एक्स-७७८४) दुचाकीला जबर धडक दिली. त्यात गोविंद नसवाले हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती श्रीकांत भास्करराव राऊत (३५, रा. उंद्री) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसात सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.