शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जीप-मालवाहूच्या धडकेत दोन ठार, १२ जखमी

By admin | Updated: May 19, 2017 00:18 IST

मोताळा: नांदुरा ते मोताळा मार्गावर वरूड फाट्यानजिक जीप व मालवाहूमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९:३० वाजता घडली.

मोताळा-नांदुरा मार्गावरील घटनालोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: नांदुरा ते मोताळा मार्गावर वरूड फाट्यानजिक जीप व मालवाहूमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९:३० वाजता घडली. मोताळा येथील मोहम्मद बशीर (पीर साहब) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत मालवाहू क्रमांक एम. एच. २८ आर ३३८६ ने १८ मे रोजी नांदुऱ्याकडे निघाले होते. दरम्यान वरूड फाट्यानजिक सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नांदुऱ्याकडून काही व्यापारी जीप क्रमांक एम. एच. २८ एबी १९७६ मधून मोताळ्याकडे येत होते. दरम्यान, रस्त्यात असलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप दोनदा उलटून समोरून येणाऱ्या मालवाहूवर जाऊन आदळली. या अपघातात मालवाहूमधील इदुलनिसाबी महमुददुीन (वय ३५) रा. जबलपूर व जीपमधील महम्मद आरिफ अब्दुल रशीद रा. नांदुरा (मोतीनगर) हे ठार झाले. तर, दोन्ही वाहनातील असलम शाह वजीर शाह (वय २८), मो. बशीर पीर साहब (वय ६०), शामीया अंजुम मो. बशीर (वय ५०), सानिया बी मो. बशीर (वय १६), सानिया अंजुम शेख नसीर (वय ६), मो. सगीर मो. बशीर (वय १८), सानिया अंजुम (वय १६), मो. जहांगीर (वय २४), रेहान खान (वय ३५), कय्युम खान अलीम खान (वय २६), शेख उमेर शेख साबीर (वय २३), सादीर खान हमीद खान (वय २१) असे १२ जण जखमी झाले. बोराखेडी पोलिसांनी जखमींना तत्काळ विविध वाहनांद्वारे बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. जखमींपैकी एकास बुलडाणा येथून औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, तहसीलदार वैशाली देवकर, संग्रामपूरचे तहसीलदार एल. के. चव्हाण व मोताळा तहसीलदार रूपेश खंडारे यांनी रुग्णालयात येऊन घटनेची माहिती व विचारपूस केली. अपघातात मालवाहूचा चुराडा झाला असून, जखमींच्या हात, पाय व तोंडाला गंभीर मार लागला आहे. जखमींमध्ये ६ व १६ वर्षांची मुलगी असून, सहा वर्षांच्या मुलीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. अ‍ॅपेमधील मृतक महिला (जबलपूर) ही मोताळा येथे आपल्या भावाकडे पाहुणी म्हणून आली होती. मालवाहूमध्ये मोताळ्याच्या आठवडी बाजारासाठी येत असलेले व्यापारी व त्यांचा कांदा, लसणाचा माल होता. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी असलमशाह वजीरशाह (वय २५) रा. मोताळा यांनी बोराखेडी ठाण्यात फिर्याद दाखल केली. जीपच्या चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३०४ अ, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.