शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोन घरे जळून खाक

By admin | Updated: March 16, 2017 03:24 IST

देवानगर येथील दोन कुटुंब बेघर.

किनगाव जट्ट (जि. बुलडाणा), दि. १५- लोणार तहसील अंतर्गत येत असलेल्या देवानगर येथील दोन नागरिकांचे घर जळून खाक झाले. ही घटना १२ मार्च रोजी घडली असून, दोन्ही कुटुंब बेघर झाले आहेत. किनगाव जट्ट येथून जवळच असलेल्या देवानगर येथे होळीच्या दिवशी येथील महिला व पुरुष होळी खेळण्यात रममान असताना अचानक रोहीदास फुलसिंग चव्हाण यांच्या घराला आग लागल्याने घर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीमध्ये घरातील ११ टीनपत्रे, गहू, ज्वारी, खाण्या-पिण्याकरिता साठवून ठेवलेले डाळ, अंगावरचे कपडे व घरातील पूर्ण कपडे, शे तीपयोगी अवजारे, तीन दरवाजे, असे एकूण ७१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आग पीडीत बेघर, निराधार झाले. आगपीडित घरात चार व्यक्ती असून, ते भूमिहीन आहेत. दुसरे घर गोविंद झिपा राठोड यांचेसुद्धा राहते घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या घरावरील दहा टीनपत्रे जळून खाक झाले असून, सोबत गहू, डाळ, दाणा, कपडे, भांडे, तीन दरवाजे, सायकल व इतर साहित्य मिळून ६९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगपीडित बेघर, निराधार झाला आहे. आग विझविण्याचा गावकर्‍यांनी प्रयत्न केला; परंतु आगीत दोन्ही घरे सामानासह जळून खाक झाले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. दरम्यान, मंडळ अधिकारी व्ही.पी.नागरे, तलाठी ए.एस.सौदर यांनी पंचनामा केला असून, पंच म्हणून किनगाव जट्ट ग्रा.पं. सदस्य नीलेश महाजन, शिवाजी जाधव, पोलीस पाटील श्रीराम पवार, कोतवाल मधुकर मिसाळ, रमेश राठोड, गलसिंग जाधव आदी पंच उपस्थित होते. आग पीडितांना शासनाचेवतीने आर्थिक मदतीची मागणी होत आहे.