शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन फुटाच्या सवलतीत १३२0 मालमत्ता सुरक्षित

By admin | Updated: July 9, 2014 00:01 IST

जुन्या वस्तीचा रस्ता दोन ुफुटाने कमी करण्याचा निर्णय महत्वाचा ठरला आहे.

प्रमोद आहेर, शिर्डीसार्इंना विठ्ठल स्वरूप मानणाऱ्या लाखो भाविकांच्या दृष्टीने शिर्डीला पंढरपूर इतकेच महत्व आहे़ सार्इंच्या मंदिरात रोज गायल्या जाणाऱ्या‘ शिर्डी माझे पंढरपूर’ या संतकवी दासगणू लिखित आरतीने रोज भाविकांना याची अनुभूती होते़ आषाढी एकादशीनिमित्त ‘साई-विठ्ठला’ची साईनगरीत सजवलेल्या पालखीतून शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात येते़संत दासगणूंना बाबांनी विठ्ठल स्वरूपात दर्शन दिल्याचा साईसच्चरित्रात उल्लेख आढळतो़ बाबांच्या काळापासून द्वारकामाईत हा उत्सव साजरा होतो़ यादिवशी पहाटे मंगलस्रानानंतर सार्इंच्या समाधीवरील मूर्तीवर पुष्पहाराच्या बरोबर तुळशीचा हार घातला जातो़ तसेच ‘शिर्डी माझे पंढरपूर’ या आरतीच्या वेळी साबुदाण्याच्या खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो़ माध्यान्ह आरतीच्या वेळीही फराळाच्या पदार्थांचा महानैवेद्य दाखवला जातो़ या आरतीच्या वेळी समाधीच्या चौथऱ्यावर पांडुरंगाचा फोटो ठेवला जातो़ सूर्यास्ताला धुपारतीच्या वेळी ‘युगे अठ्ठावीस़़़’ही पांडुरंगाची आरती म्हटली जाते़ धुपारतीनंतर सार्इंच्या पादुका, सटका समाधीच्या चौथऱ्यावर दर्शनासाठी ठेवण्यात येतो़ रात्री साडेआठ वाजता ग्रामस्थ भजनी मंडळ भजन सुरू करतात़ रात्री सव्वा नऊ वाजता सार्इंचा व पांडुरंगाचा फोटो, पादुका, सटका घेऊन मिरवणूक द्वारकामाई मंदिरात येते़ मंदिरात आल्यानंतर फोटो प्रथम बाबांच्या बसण्याच्या शिळेवर ठेवला जातो़ भजनानंतर साई-विठ्ठलाचे फोटो पालखीत ठेवले जातात़ या पालखीची मिरवणूक काढण्यात येते़ मिरवणूक परत आल्यानंतर गुरूस्थान मंदिरासमोर भारुडाचा कार्यक्रम होतो़ त्यानंतर शेजारती होते़सार्इंना विठ्ठल स्वरूप मानणाऱ्या स्वर्गीय ह़भ़प़लक्ष्मण महाराज वाकचौरे यांनी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी शिर्डी-पंढरपूर वारीचा श्रीगणेशा केला़ वाकचौरे यांच्या पश्चात ह़भ़प़भास्कर महाराज गोंदकर यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे़ याशिवाय गेल्या सात वर्षापूर्वी ह़भ़पक़ाशिकानंद महाराज यांनीही साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व साईनिर्माण गु्रप यांच्या मदतीने शिर्डी-पंढरपूर वारी सुरू केली आहे़ विठ्ठल मूर्ती बसविण्यामागे साईबाबांची प्रेरणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील रत्नपारखींच्या विठ्ठल मंदिरातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते़ या मंदिरातील मूर्ती बसवण्यामागे साईबाबांची प्रेरणा होती, याच मंदिरात बसून संत दासगणूंनी जगभरातील साईभक्तांना भुरळ घालणाऱ्या ‘शिर्डी माझे पंढरपूर’ या आरतीची निर्मिती केली होती़