शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पुरात दोन बैल वाहून गेले

By admin | Updated: September 2, 2014 00:35 IST

सततच्या पावसामुळे नदीला पुर येवून पुलावर पाणी वाढल्याने रस्ता पार करताना निमकवळा येथील शेतकर्‍याचे दोन बैल गाडीसह ज्ञानगंगा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत.

खामगाव : सततच्या पावसामुळे नदीला पुर येवून पुलावर पाणी वाढल्याने रस्ता पार करताना निमकवळा येथील शेतकर्‍याचे दोन बैल गाडीसह ज्ञानगंगा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. तालुक्यातील निमकवळा येथील अशोक भारसाकळे हा शेतकरी आज १ सप्टेंबर रोजी सकाळीच नदीवर बसविलेली विद्युत मोटार पाण्यातून काढण्यासाठी बैलगाडीने चालले होते. दरम्यान निम्न ज्ञानगंगा प्रकल्पावरील पुलावर अचानक पाणी वाढल्याने बैलासह गाडी वाहून गेली. यामध्ये अशोक भारसाकळे यांनी प्रसंगावधान राखून गाडीतून उडी मारल्याने ते बचावले. मात्र त्यांचे दोन्ही बैल पाण्यात बुडाल्याने मृत्यूमुखी पडले. ऐन हंगामाच्या वेळी शेतकर्‍यांचे ६0 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे.(शहर प्रतिनिधी) पुरामुळे गावांचा संपर्क तुटला मलकापूर: तालुक्यातील मौजे हरसोडा व मौजे काळेगाव या पुर्णाकाठी वसलेल्या दोन गावांचा आज सकाळी १0 वाजेपासून संपर्क तुटल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली आहे. मलकापूर तालुक्यात अजूनही पावसाची दमदार हजेरी नाही. परिणामी नळगंगा व विश्‍वगंगा या नदयांना अजुनही पूर नाही. तर पुर्णानदीच्या काठावर वसलेले हरसोडा व काळेगाव ही दोन गावे पावसाळ्यात दरवर्षी पाऊस नाही मात्र विदर्भात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने पुर्णर नदीला ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर महापूर आला आहे. पाण्याची पातळी वाढल्याने बॅकवाटर विश्‍वगंगेत आले. त्यामुळे काळेगाव प्रभावीत होवून त्या गावाचा संपर्क तुटला.तर हरसोड्यातील नाल्यात पुर्णेच्या महापुराच्या बॅकवाटरची पातळी कालपासून वाढल्याने त्या गावाचाही संपर्क तुटल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली आहे.