शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पुरात दोन बैल वाहून गेले

By admin | Updated: September 2, 2014 00:35 IST

सततच्या पावसामुळे नदीला पुर येवून पुलावर पाणी वाढल्याने रस्ता पार करताना निमकवळा येथील शेतकर्‍याचे दोन बैल गाडीसह ज्ञानगंगा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत.

खामगाव : सततच्या पावसामुळे नदीला पुर येवून पुलावर पाणी वाढल्याने रस्ता पार करताना निमकवळा येथील शेतकर्‍याचे दोन बैल गाडीसह ज्ञानगंगा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. तालुक्यातील निमकवळा येथील अशोक भारसाकळे हा शेतकरी आज १ सप्टेंबर रोजी सकाळीच नदीवर बसविलेली विद्युत मोटार पाण्यातून काढण्यासाठी बैलगाडीने चालले होते. दरम्यान निम्न ज्ञानगंगा प्रकल्पावरील पुलावर अचानक पाणी वाढल्याने बैलासह गाडी वाहून गेली. यामध्ये अशोक भारसाकळे यांनी प्रसंगावधान राखून गाडीतून उडी मारल्याने ते बचावले. मात्र त्यांचे दोन्ही बैल पाण्यात बुडाल्याने मृत्यूमुखी पडले. ऐन हंगामाच्या वेळी शेतकर्‍यांचे ६0 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे.(शहर प्रतिनिधी) पुरामुळे गावांचा संपर्क तुटला मलकापूर: तालुक्यातील मौजे हरसोडा व मौजे काळेगाव या पुर्णाकाठी वसलेल्या दोन गावांचा आज सकाळी १0 वाजेपासून संपर्क तुटल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली आहे. मलकापूर तालुक्यात अजूनही पावसाची दमदार हजेरी नाही. परिणामी नळगंगा व विश्‍वगंगा या नदयांना अजुनही पूर नाही. तर पुर्णानदीच्या काठावर वसलेले हरसोडा व काळेगाव ही दोन गावे पावसाळ्यात दरवर्षी पाऊस नाही मात्र विदर्भात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने पुर्णर नदीला ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर महापूर आला आहे. पाण्याची पातळी वाढल्याने बॅकवाटर विश्‍वगंगेत आले. त्यामुळे काळेगाव प्रभावीत होवून त्या गावाचा संपर्क तुटला.तर हरसोड्यातील नाल्यात पुर्णेच्या महापुराच्या बॅकवाटरची पातळी कालपासून वाढल्याने त्या गावाचाही संपर्क तुटल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली आहे.