शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

जातीची बंधने झुगारुन जुळल्या रेशीमगाठी!

By admin | Updated: February 14, 2017 00:27 IST

एक वर्षात २0७ आंतरजातीय प्रेमविवाह.

बुलडाणा, दि. १३- प्रेमात फुलांबरोबर येणारे काटे हे प्रेमवीरांना नेहमीच बोचणारे असतात. कुटूंबाकडून होणारा विरोध आणि जातीची तेढ निर्माण करुन प्रेमाला आवर घालण्याचा प्रयत्न जालीम जमाना करतो. मात्र, या जातीच्या बंधनाला झुगारुन तेरा महिन्यात जिल्ह्यात २0७ आंतरजातीय प्रेमीजोडपी विवाहाच्या रेशीमगाठीत बांधल्या गेले.एकमेकांशी प्रेम करणारे कधीच जगाची पर्वा करीत नाही. पण कुटुंबाचा व समाजाचा विरोध व रोष त्यांच्या पाचवीला पुजलेला असतो. सोबत जगण्याच्या आणाभाका घेऊनही प्रेमात यश मिळाले नाही, तर बर्‍याच वेळा युवक-युवतींनी मृत्यूला कवटाळले, अशा घटना बर्‍याच घडल्या आहेत. या गोष्टीमुळे समाज ढवळून निघाला खरा, मात्र समाजाची मानसिकता बदलली नाही. समाजाची मानसिकता बदलून जातीय तिढा सुटावा, विविध धर्माच्या संस्कृतीचा मिलाप व्हावा, यासाठी शासनाने सुद्धा २0१0 नंतर आंतरजातीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहे. मात्र तरीही प्रेमी युगुलाकडे पाहण्याची समाजाची वक्रदृष्टी तीळमात्रही बदलली नाही.या जातीच्या बंधनाला झुगारुन जिल्ह्यात २0१६-२0१७ मध्ये २0७ आंतरजातीय युगुल विवाहाच्या रेशीमगाठीत अडकले. यात २0१६ मध्ये जानेवारी महिन्यात १५, फेब्रुवारी १0, मार्चमध्ये ३0, एप्रिल २५, मे महिन्या २0, जून १0, जुलै ५, ऑगस्ट मध्ये १८, सप्टेंबर १५, ऑक्टोबर १६, नोब्हेंबर २५, डिसेंबर महिन्यात ७ आणि जानेवारी २0१७ मध्ये १0 अशी आंतरजातीय प्रेमीयुगुलांनी विवाहासाठी नोंदणी केली.

प्रोत्साहन रकमेत तीन लाखांनी वाढ आंतरजातीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने २0१0 नंतर विविध नवीन योजना अंमलात आणल्या. यात आंतरजातीय विवाह झाल्यानंतर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या योजनेंतर्गत जोडप्यांना ५0 हजार रुपयांचा धनादेश दिला जातो. शिवाय त्यांना कायद्याचे संरक्षण मिळते. २0१६ नंतर शासनाने अशा आंतरजातीय विवाहित जोडप्यांना मिळणार्‍या प्रोत्साहन रकमेत तीन लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे.