शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जातीची बंधने झुगारुन जुळल्या रेशीमगाठी!

By admin | Updated: February 14, 2017 00:27 IST

एक वर्षात २0७ आंतरजातीय प्रेमविवाह.

बुलडाणा, दि. १३- प्रेमात फुलांबरोबर येणारे काटे हे प्रेमवीरांना नेहमीच बोचणारे असतात. कुटूंबाकडून होणारा विरोध आणि जातीची तेढ निर्माण करुन प्रेमाला आवर घालण्याचा प्रयत्न जालीम जमाना करतो. मात्र, या जातीच्या बंधनाला झुगारुन तेरा महिन्यात जिल्ह्यात २0७ आंतरजातीय प्रेमीजोडपी विवाहाच्या रेशीमगाठीत बांधल्या गेले.एकमेकांशी प्रेम करणारे कधीच जगाची पर्वा करीत नाही. पण कुटुंबाचा व समाजाचा विरोध व रोष त्यांच्या पाचवीला पुजलेला असतो. सोबत जगण्याच्या आणाभाका घेऊनही प्रेमात यश मिळाले नाही, तर बर्‍याच वेळा युवक-युवतींनी मृत्यूला कवटाळले, अशा घटना बर्‍याच घडल्या आहेत. या गोष्टीमुळे समाज ढवळून निघाला खरा, मात्र समाजाची मानसिकता बदलली नाही. समाजाची मानसिकता बदलून जातीय तिढा सुटावा, विविध धर्माच्या संस्कृतीचा मिलाप व्हावा, यासाठी शासनाने सुद्धा २0१0 नंतर आंतरजातीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहे. मात्र तरीही प्रेमी युगुलाकडे पाहण्याची समाजाची वक्रदृष्टी तीळमात्रही बदलली नाही.या जातीच्या बंधनाला झुगारुन जिल्ह्यात २0१६-२0१७ मध्ये २0७ आंतरजातीय युगुल विवाहाच्या रेशीमगाठीत अडकले. यात २0१६ मध्ये जानेवारी महिन्यात १५, फेब्रुवारी १0, मार्चमध्ये ३0, एप्रिल २५, मे महिन्या २0, जून १0, जुलै ५, ऑगस्ट मध्ये १८, सप्टेंबर १५, ऑक्टोबर १६, नोब्हेंबर २५, डिसेंबर महिन्यात ७ आणि जानेवारी २0१७ मध्ये १0 अशी आंतरजातीय प्रेमीयुगुलांनी विवाहासाठी नोंदणी केली.

प्रोत्साहन रकमेत तीन लाखांनी वाढ आंतरजातीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने २0१0 नंतर विविध नवीन योजना अंमलात आणल्या. यात आंतरजातीय विवाह झाल्यानंतर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या योजनेंतर्गत जोडप्यांना ५0 हजार रुपयांचा धनादेश दिला जातो. शिवाय त्यांना कायद्याचे संरक्षण मिळते. २0१६ नंतर शासनाने अशा आंतरजातीय विवाहित जोडप्यांना मिळणार्‍या प्रोत्साहन रकमेत तीन लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे.