शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वनविभागाच्या आशिर्वादाने वृक्षतोड जोमात

By admin | Updated: June 30, 2017 20:29 IST

सिंदखेडराजा : वनविभागाच्या व इतर खात्याच्या आशिर्वादाने वृक्षतोड माफीयांनी हैदोस घातला असून, अनेक झाडांची मशिनीद्वारे कटाई करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककाशिनाथ मेहेत्रे/सिंदखेडराजा : शासनाने येत्या तीन वर्षामध्ये वनविभागासह शासनाच्या एकूण तेहतीस विभागामार्फत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. यावर्षी चार कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली. तर दुसरीकडे वनविभागाच्या व इतर खात्याच्या आशिर्वादाने वृक्षतोड माफीयांनी हैदोस घातला असून, अनेक झाडांची मशिनीद्वारे कटाई करण्यात येत आहे.बेसुमार अवैध वृक्षतोड करण्याला वनविभागासह संबंधित खात्याचे अधिकारी जबाबदार आहे. माफीयांना वृक्ष तोड करताना अधिकारी, कर्मचारी वैयक्तीक लाभापोटी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करतात. ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वृक्षतोड होत आहे, अशा लोकांवर कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी वृक्ष पे्रमींची मागणी आहे. वाढत चाललेले तापमान, अनियमीत पडणारा पाऊस, दुष्काळ, पाण्याची भिषण टंचाई, यावर उपाय करण्यासाठी महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीवर करोडो रुपये खर्च करीत आहे. तर दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, वृक्षलागवड करणारे असंख्य लोक वर्तमान पत्रात फोटो छापून येण्यापुरता कार्यक्रम राबवतात. दरवर्षी त्याच गड्डयामध्ये नवीन रोप लावल्या जाते, फक्त लावणारे बदलतात. लावलेली किती वृक्ष जगली याचा मात्र ताळमेळ नाही. शेतकरी आर्थिक संकटामध्ये आहे. घरप्रपंच चालविण्यासाठी, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच उरला नाही. विकण्यासाठी कोणताच शेतमाल शिल्लक नसल्यामुळे गोठ्यातील गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या विकून आजपर्यंत तग धरुन असलेला बळीराजा शेतात शेताच्या बंधाऱ्यावर असलेले बाप-दादापासून सांभाळ केलेली निंबाची, आंब्याची, चिंच, बोर, साग, जांभुळ, बाभळीची मोठमोठी झाडे मातीमोल किंमतीमध्ये वृक्षतोड माफीयांना विकत आहेत. त्याला वनविभागाचे व संबंधित खात्याचे अधिकारी कर्मचरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक तडजोड करुन वृक्षतोडीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहे. सध्या वनविभागाच्या जंगलात निंबाची कटाई केलेली मोठमोठी वृक्ष याची साक्ष देतांना दिसत आहे.