शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा झालेल्या सात रुग्णांवर उपचार सुरूच

By admin | Updated: September 16, 2016 02:58 IST

१३४ जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी नारायणपूर ता.नांदुरा येथे घडली होती.

खामगाव, दि. १५: गणेशोत्सवानिमित्त झालेल्या भंडार्‍याच्या कार्यक्रमात १३४ जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी नारायणपूर ता.नांदुरा येथे घडली होती. या सर्व रुग्णांना उपचारासाठी स्थानिक सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान, दुसर्‍या दिवशी गुरुवारी सकाळी यापैकी १२७ रुग्णांना सुटी देण्यात आली असून, सात रुग्णांवर दुसर्‍या दिवशीही उपचार सुरु आहेत. गणेशोत्सवादरम्यान नारायणपूर येथे १४ सप्टेंबर रोजी गावकर्‍यांनी आयोजित केलेल्या भंडार्‍यात पोळी, काशिफळाची भाजी, वरण, भात असा महाप्रसाद घेतल्यानंतर सायंकाळी महाप्रसाद घेतलेल्या काही ग्रामस्थांना उलटी, मळमळ, चक्कर येणे यासारखे त्रास जाणवू लागल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचारासाठी धाव घेतली होती. सुरुवातीला ८0 व उशिरा रात्रीपर्यंंंत एकूण १३४ रुग्णांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, दुसर्‍या दिवशी यापैकी १२७ रुग्णांना सुटी देण्यात आली असून, कुणाल सुनील वानखडे (वय ११), राहुल सुनील वानखडे (वय १२), विजेंद्र श्रीकृष्ण वानखडे (वय १९), दीपक विश्राम वानखडे (वय २२) रा.निमगाव, प्रगती बाबूराव वाघ (वय ६), नितीन श्रीकृष्ण वानखडे (वय १८) रा.नारायणपूर असे सात जणांवर दुसर्‍या दिवशीही उपचार सुरू आहेत.