शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली

By admin | Updated: March 12, 2015 01:55 IST

राज्यातील चित्र ; सहा वर्षांत ५७ लाख टन टोमॅटो उत्पादन

ब्रम्हानंद जाधव/ मेहकर : राज्यात गत सहा वर्षांपासून टोमॅटोचे ५७ लाख टन उत्पादन झाले; परंतु मागणीच्या तुलनेत टोमॅटोचे उत्पादन, पुरवठा जास्त असल्याने दर कोसळलेले राहत आहेत. परिणामी टोमॅटो उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकर्‍यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. या परिस्थितीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली सापडले आहेत.राज्यातील पीकक्षेत्रातील सुमारे २९ हजार ११0 हेक्टर क्षेत्र हे टोमॅटो लागवडीखालील आहे. खरीप, रब्बी हंगाम तसेच उन्हाळ्यातही टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो उत्पादन घेण्याकडे विदर्भातील शेतकर्‍यांचाही कल वाढला आहे. राज्यात गत सहा वर्षापासून टोमॅटो लागवड क्षेत्रामध्ये दीडपटीने वाढ झाली आहे. राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली या जिल्ह्यांपाठोपाठ पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. सन २00९ पासून राज्यात ५६ लाख ८९ हजार टन टोमॅटोचे उत्पादन घेण्यात आले आहे. टोमॅटोचे उत्पादन मागणीच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकर्‍यांना टोमॅटोची अत्यंत कमी भावात विक्री करावी लागत आहे. टोमॅटो उत्पादनासाठी एकरी सरासरी ७0 हजार रुपये खर्च येत असून, उत्पादन सरासरी पाच ते सहा टन होत आहे. वार्षिक सरासरी १0 ते १२ रुपये किलो दर टोमॅटोला राहत असल्याने शेतकर्‍यांचा उत्पादनखर्चही भरून निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येत आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन व पुरवठा जास्त असल्याने टोमॅटोचे दरवर्षी घसरलेले दर शेतकर्‍यांच्या कर्जबाजारीपणात भर टाकत आहेत.