शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कलिंगड रस्त्यावर टाकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST

साखरखेर्डा परिसरातील शिंदी, सवडद, तांदूळवाडी, आंबेवाडी या चार गावांत बागायतदार शेतकरी जास्त आहेत. यापैकी अनेकांनी शेतातच घर करून राहणे ...

साखरखेर्डा परिसरातील शिंदी, सवडद, तांदूळवाडी, आंबेवाडी या चार गावांत बागायतदार शेतकरी जास्त आहेत. यापैकी अनेकांनी शेतातच घर करून राहणे पसंत केले आहे. बागायती शेती कसायची असेल, तर सकाळीच फवारणी, पाणी देणे, शेतीची मशागत ही कामे करावी लागतात. मजूर कामावर असले, तरी सर्व कामे त्यांच्यावर अवलंबून करायची म्हटलं तर नियमित होत नाही. स्वतः शेतकऱ्याला मेहनत घ्यावी लागते. शिंदी येथील विनोद खरात हे बागायती शेती करतात. आजही पारंपरिक पीक घेण्यापेक्षा त्यांनी कलिंगड, खरबूज, डाळिंब, पेरू, आंबा या फळबागा लावल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. डाळिंबाची फुले गळून पडली. कलिंगडाची लागवड यशस्वी झाली असताना व्यापाऱ्यांनी मालाची उचल केली नाही. गेल्या चार महिन्यांपासून बाजार बंद असल्याने नेमके कलिंगड न्यावे कोठे? हा प्रश्न पडला आहे. काढलेले कलिंगड व्यापाऱ्यांनी नेले नसल्याने विनोद खरात यांनी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना नेता येईल एवढे कलिंगड वाटण्याचा निर्णय घेतला. कारण फळ खराब होते, त्याची दुर्गंधी पसरते. यापेक्षा फुकट वाटलेले बरे ! असा निर्णय त्यांनी घेतला.

--पाच लाखांचा तोटा--

शेतकऱ्यांना यंदा मोठा तोटा सहन करावा लागला. कलिंगड विक्री न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड रस्त्यावर फेकून दिले, तर काहींनी वाटप केले. यावर्षी शेतकरी विनोद खरात यांना पाच लाखांचा तोटा सहन करावा लागला. हीच अवस्था तांदूळवाडी, सवडद, आंबेवाडी येथील शेतकऱ्यांची आहे.