शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:28 IST

यावर्षी आजाराचे कमी प्रमाण झाल्यामुळे नव्याने कर्ज काढून उत्साहाने व्यवसाय करण्याकरिता व्यवसायिक सज्ज झाले होते़ परंतु, जानेवारीपासून दुसरी ...

यावर्षी आजाराचे कमी प्रमाण झाल्यामुळे नव्याने कर्ज काढून उत्साहाने व्यवसाय करण्याकरिता व्यवसायिक सज्ज झाले होते़ परंतु, जानेवारीपासून दुसरी लाट आल्याने पुन्हा सर्व सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली़ लग्न समारंभाकरिता पंचवीस नागरिकांचे उपस्थिती व वेळेचे बंधन घातल्याने पुन्हा व्यवसाय ठप्प झाला आहे़ त्यामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी या व्यावसायिकांकडून जोर धरत आहे़

दरवर्षी हिंदू धर्म संस्कृतीच्या परंपरेनुसार तुळशी विवाह झाला की, लग्नसराईला सुरुवात होते़ गतवर्षीचा अनुभव पाहता कोरोना संसर्ग आजार नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये कमी असल्याने यावर्षी सर्व समाजातील वर- वधू यांची सोयरीक जुळून कुंकू टिळा उरकून लग्नाचे मुहूर्त ठरवून ठेवण्यात आले होते़ यामध्ये मार्च एप्रिल मे महिन्यात लग्नाची धूम असते तर काही गावांमध्ये एका तिथीवर लग्न केले जातात़ त्यामुळे पूर्वतयारी म्हणून काही पालकांनी अगोदरच मंगल कार्यालय लग्नपत्रिका ,घोडा, आचारी, फोटोग्राफर, बँड बाजा यांना तारीख घेऊन इस्सारसुद्धा देऊन ठेवला होता़ मात्र, जानेवारी महिन्यापासून पुन्हा दुसरी लाट आल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोना आजार झपाट्याने वाढत असल्याने शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा सोडून नाका-बंदी संचारबंदी असे आदेश दिले़ कामाशिवाय घरा बाहेर पडण्यास मनाई आदेश लागू करण्यात आल्यामुळे सर्व सामाजिक धार्मिक सांस्कृतिक सोहळे स्थगित करण्यात आले आहे़ लग्न पंचवीस नागरिकांचे उपस्थित व वेळेच्या आत विवाह सोहळे उरकले जात असल्याने विवाह निगडित व्यवसाय थांबले आहेत़ त्यामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़