शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

धोके दुर केल्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात सोडणार वाघीण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 11:00 IST

व्याघ्र संवर्धन समितीची बैठक घेण्यात येऊन त्यात प्रत्यक्ष वाघीण सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावलेल्या टी-१ सी-१ वाघासाठी पेंच किंवा ताडोबामधून जोडीदार म्हणून वाघिण मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने तथा कॉरिडॉर बळकटीसाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना केल्यानंतरच जवळपास सहा महिन्यांनंतरही व्याघ्र संवर्धन समितीची बैठक घेण्यात येऊन त्यात प्रत्यक्ष वाघीण सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.प्रथमत: ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघामुळे निर्माण होणारा संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासोबतच अभयारण्यातून जाणाºया रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यास प्राधान्य देण्यावर भर आहे. सोबतच मेंढी चराई व देव्हारी गावाचे पुनर्वसन प्राधान्याने करण्यात येणार आहे. मात्र कोवीड संसर्गामुळे त्यासाठी निधी मिळण्याच्या अडचणी आहेत. परिणामी कोवीड संसर्ग टी-१ सी-१ ला सहचारीणी मिळण्यात मोठा अडथळा ठरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.या व्यतिरिक्त समांतरस्तरावर बुलडाणा जिल्ह्यातील अंबाबरावा, अकोला जिल्ह्यातील कोटपूर्णा, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी या चार अभयारण्याचेही संवर्धन करण्यासोबतच या भागातही मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याच्या दृष्टीने वन्यजीव विभागातंर्गत सध्या मंथन सुरू आहे. प्रामुख्याने श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेतंर्गत वनग्रामांचे पुनर्वसन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. यासोबतच ज्ञानंगगा अभयारण्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीनेही येत्या काळात हालचाली होवू शकतात. प्रादेशिक वन विभागाच्या अखत्यारितील ज्ञानगंगा अभयारण्यालगतचा भाग हा अभयारण्यात समाविष्ट करून अभयारण्याचे क्षेत्रही प्रसंगी वाढविल्या जावू शकते. मात्र या सर्व बाबी करताना राजकीय इच्छा शक्ती हाही महत्त्वाचा निकष यामध्ये राहणार आहे.

२० वाघांसाठी लागते एक हजार चौ. किमी वन क्षेत्रकोरोना संसर्गची व्याप्ती संपुष्टात आल्यानंतरच प्रामुख्याने ज्ञानगंगात वाघिण सोडण्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब होवू शकते. सोबतच येथे वाघीण सोडल्यानंतर अभयारण्यात वाघांची संख्या वाढू शकते. साधारणत: २० वाघांसाठी ८०० ते १००० चौ. किमी वनक्षेत्र लागते. तसेच प्रती चौरस किमी जवळपास १८ अन्न साखळीतील प्राणी लागतात. त्यानुषंगाने ज्ञानगंगाची स्थिती उत्तम असली तरी भविष्यातील स्थिती पाहता टायगर कॉरिडॉर बळकट करण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. स्थानिक पातळीवरील व्याघ्र संवर्धनातील धोके दुर करण्यास सध्या प्राधान्य दिले जात आहे.

वन ग्रामपुनर्वसनाला प्राधान्यअकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा, अंबाबरवा आणि मुक्ताई भवानी अभयारण्या लगतच्या वनग्रामांचे प्रारंभी श्यामा प्रसाद मुखर्जी योजनेतंर्गत पुनर्वसन करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. सोबतच समांतरस्तरावर अभयारण्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सहा महिन्यात कोरोना संसर्गाची स्थिती, निधीची उपलब्धता व अन्य परिस्थिती संदर्भात व्याघ्र संवर्धन समिती आढावा घेण्यासाठी पुन बैठक घेणार आहे. त्यावेळी एकंदर परिस्थितीचा आढावा घेवून अनुषंगीक निर्णय घेतला जावू शकतो असे एका अधिकाºयाने स्पष्ट केले.

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यTigerवाघbuldhanaबुलडाणा