शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

बुलडाणा जिल्हय़ात साहित्यरसिकांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:09 IST

बुलडाणा-हिवराआश्रम : देशाची राजधानी दिल्लीविरुद्ध ग्रामपंचायत स्तरावरील संस्थेच्या चढाओढीत रसिकाश्रयांचा विजय झाला. विवेकानंद आश्रमाने दाखविलेले धाडस व घेतलेल्या मेहनतीचा हा विजय असून, हिवराआश्रम येथे ९१ अ.भा. मराठी साहित्य संमेलन भव्य- दिव्य पार पाडण्याचा निर्धार जिल्ह्यातील साहित्यरसिकांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे रसिकाश्रयांचा विजय विवेकानंद आश्रमाने दाखविलेले धाडस हिवराआश्रम येथे ९१ अ.भा. मराठी साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा-हिवराआश्रम : देशाची राजधानी दिल्लीविरुद्ध ग्रामपंचायत स्तरावरील संस्थेच्या चढाओढीत रसिकाश्रयांचा विजय झाला. विवेकानंद आश्रमाने दाखविलेले धाडस व घेतलेल्या मेहनतीचा हा विजय असून, हिवराआश्रम येथे ९१ अ.भा. मराठी साहित्य संमेलन भव्य- दिव्य पार पाडण्याचा निर्धार जिल्ह्यातील साहित्यरसिकांनी व्यक्त केला आहे.अखिल भारतीय साहित्य संमेलन हिवराआश्रम येथे आयोजित करण्याचे निमंत्रण विवेकानंद आश्रमाच्यावतीने पाठविण्यात आले होते. महामंडळाकडे आलेल्या सहा निमंत्रणापैकी तीन निमंत्रण स्वीकारत स्थळ पाहणी करण्यात आली. यामध्ये दिल्ली, बडोदा व हिवराआश्रमचा समावेश आहे. या स्थळाची पाहणी संपल्यानंतर रविवारी नागपूर येथे पार पडलेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत यंदाचे साहित्य संमेलन हे हिवराआश्रम येथे होणार, यावर महामंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. हिवराआश्रमला साहित्य संमेलन मिळाल्याने रसिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राजमाता जिजाऊ, संत चोखामेळा, कविवर्य ना.घ. देशपांडे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व हिवराआश्रमची खरी ओळख असलेले शुकदास महाराज, अशी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे. शिवाय, आतापर्यंत एकूण नव्वद संमेलने झालीत; परंतु संमेलनाच्या यजमान पदाचा मान या जिल्ह्याला मिळालेला नाही. हिवराआश्रम एक ग्रामपंचायत स्तरावरील वसलेले गाव असून, येथील विवेकानंद आश्रम ही संस्था संमेलनाची आयोजक आहे. विवेकानंद जन्मोत्सवाचा भक्कम नियोजनाचा प्रदीर्घ अनुभव या संस्थेच्या पाठीशी आहे.