शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

दुष्काळातही उंबरठा उत्पन्न जास्त!

By admin | Updated: July 21, 2016 23:53 IST

शासनाचा अहवालानुसार दुष्काळातही उंबरठा उत्पन्न जास्त दाखवल्याने ८६ हजार ३३८ शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित.

विवेक चांदूरकर / बुलडाणाजिल्ह्यात सातत्याने तीन वर्षांपासून अल्प पावसामुळे दुष्काळ असल्यावरही शासनाच्यावतीने जिल्ह्यातील पिकांचे उंबरठा उत्पन्न जास्त दाखविण्यात आल्याने जिल्ह्यातील कापूस व तूर उत्पादक ८६ हजार ३३८ शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित राहिले आहेत. दुसरीकडे शेतकर्‍यांनी ५0 टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न झाल्यावरही उंबरठा उत्पादन जास्त कसे निघाले? असा आरोप केला आहे. जिल्ह्यात सन २0१२ पासून अवर्षण होत आहे. तीन वर्षे जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने किंवा पावसाने एक ते दीड महिन्याची दडी दिल्याने पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली, तर काही शेतकर्‍यांना दरवर्षीपेक्षा ५0 टक्के कमी उत्पन्न झाले. मात्र, अशी परिस्थिती असतानाही जिल्ह्यात तूर पिकासाठी ५९, तर कापसासाठी ४७ महसूल मंडळांमध्ये उंबरठा उत्पन्न जास्त झाल्याचे शासनाने दाखविले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हेक्टरी ६८00 रुपये दुष्काळी मदत मिळाली. यासोबतच शेतकर्‍यांना पीक विमाही मिळाला. मात्र, शासनाने उंबरठा उत्पन्न जास्त दाखविल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी या दोन्ही दुष्काळी मदत व पीक विम्यापासून वंचित राहिले. असे निघते उंबरठा उत्पन्न यावषीर्चे सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त आल्यास विमा नुकसानभरपाई मिळत नाही. उंबरठा उत्पन्न हे मागील पाच वर्षाच्या सरासरी गुणीले जोखीमस्तर यानुसार निश्‍चित करतात. पीक विमा नुकसानभरपाईचा लाभ न मिळालेल्या शेतकरी खातेदारांपैकी तूर ५५ हजार ९८८ व कापूस २0 हजार ३४४ या दोन पिकांचे जास्तीत जास्त खातेदार आहेत.२२९ महसूल मंडळे पीक विम्यापासून वंचित जिल्ह्यात एकूण कापूस पिकासाठी ४७, तूर पिकासाठी ५९, भुईमूग पिकासाठी १७, तिळासाठी ४0, मूग पिकासाठी २२, उडीद पिकाकरिता ५, सोयाबीनसाठी एक आणि ज्वारी पिकासाठी ३९ महसूल मंडळांमध्ये पीक विमा मंजूर नाही. पीक विमा मंजूर नसलेल्या महसूल मंडळातील शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारे पीक विमा नुकसानभरपाईपासून वगळले किंवा वंचित ठेवण्यात आलेले नाही. या महसूल मंडळामध्ये वार्षिक सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त आल्यामुळे पीक विमा लागू झालेला नाही.