शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

दुष्काळातही उंबरठा उत्पन्न जास्त!

By admin | Updated: July 21, 2016 23:53 IST

शासनाचा अहवालानुसार दुष्काळातही उंबरठा उत्पन्न जास्त दाखवल्याने ८६ हजार ३३८ शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित.

विवेक चांदूरकर / बुलडाणाजिल्ह्यात सातत्याने तीन वर्षांपासून अल्प पावसामुळे दुष्काळ असल्यावरही शासनाच्यावतीने जिल्ह्यातील पिकांचे उंबरठा उत्पन्न जास्त दाखविण्यात आल्याने जिल्ह्यातील कापूस व तूर उत्पादक ८६ हजार ३३८ शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित राहिले आहेत. दुसरीकडे शेतकर्‍यांनी ५0 टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न झाल्यावरही उंबरठा उत्पादन जास्त कसे निघाले? असा आरोप केला आहे. जिल्ह्यात सन २0१२ पासून अवर्षण होत आहे. तीन वर्षे जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने किंवा पावसाने एक ते दीड महिन्याची दडी दिल्याने पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली, तर काही शेतकर्‍यांना दरवर्षीपेक्षा ५0 टक्के कमी उत्पन्न झाले. मात्र, अशी परिस्थिती असतानाही जिल्ह्यात तूर पिकासाठी ५९, तर कापसासाठी ४७ महसूल मंडळांमध्ये उंबरठा उत्पन्न जास्त झाल्याचे शासनाने दाखविले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हेक्टरी ६८00 रुपये दुष्काळी मदत मिळाली. यासोबतच शेतकर्‍यांना पीक विमाही मिळाला. मात्र, शासनाने उंबरठा उत्पन्न जास्त दाखविल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी या दोन्ही दुष्काळी मदत व पीक विम्यापासून वंचित राहिले. असे निघते उंबरठा उत्पन्न यावषीर्चे सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त आल्यास विमा नुकसानभरपाई मिळत नाही. उंबरठा उत्पन्न हे मागील पाच वर्षाच्या सरासरी गुणीले जोखीमस्तर यानुसार निश्‍चित करतात. पीक विमा नुकसानभरपाईचा लाभ न मिळालेल्या शेतकरी खातेदारांपैकी तूर ५५ हजार ९८८ व कापूस २0 हजार ३४४ या दोन पिकांचे जास्तीत जास्त खातेदार आहेत.२२९ महसूल मंडळे पीक विम्यापासून वंचित जिल्ह्यात एकूण कापूस पिकासाठी ४७, तूर पिकासाठी ५९, भुईमूग पिकासाठी १७, तिळासाठी ४0, मूग पिकासाठी २२, उडीद पिकाकरिता ५, सोयाबीनसाठी एक आणि ज्वारी पिकासाठी ३९ महसूल मंडळांमध्ये पीक विमा मंजूर नाही. पीक विमा मंजूर नसलेल्या महसूल मंडळातील शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारे पीक विमा नुकसानभरपाईपासून वगळले किंवा वंचित ठेवण्यात आलेले नाही. या महसूल मंडळामध्ये वार्षिक सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त आल्यामुळे पीक विमा लागू झालेला नाही.