शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

मेहकर बाजार समितीत सोयाबीनची तीन हजार क्विंटलची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 19:39 IST

मेहकर : सोयाबीन पिक निघायला सुरुवात झाली असून, ४ आॅक्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे. मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देसोयाबीन पिक निघायला सुरुवात सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण 

उध्दव फंगाळ  लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : सोयाबीन पिक निघायला सुरुवात झाली असून, ४ आॅक्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे. मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.मेहकर तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी अधिक होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात पाऊस चांगला पडला असला तरीपण त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने याचा परिणाम सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिकांवर झाला आहे. अनेक शेतकºयांना एका एकरामध्ये केवळ ३ ते ४ क्विंटलची झडती लागली आहे. शेतकºयांना विविध बँकांकडून पेरणीच्या वेळेवर पिककर्ज मिळाले नसल्याने बहुतांश शेतकºयांनी उसनवार करुन तर उधारीवर बि-बियाणे, खते खरेदी करुन पेरणी केली आहे. मात्र पावसाने सुद्धा वेळेवर साथ दिल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. पाहिजे त्या प्रमाणात पिकांचे उत्पादन झाले नाही तर बाजारात सोयाबीनला २ हजार ५०० रुपये ते २ हजार ८०० रुपयेच भाव आहे. उडीद, मूग, तूर, चना, गहू या पिकांना सुद्धा भाव नाहीत. शेतात पेरणीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघतो का नाही, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. तर पेरणीसाठी लोकांकडून आणलेले पैसे, इतर उसनवार कशी फेडावी, या विवंचनेत शेतकरी दिसत आहेत. नुकताच दसरा सण झाला असून दिवाळी अवघ्या काही दिवसावर आली आहे. पिकांच्या उत्पादनात झालेली घट, बाजारात पिकांना भाव नसणे, यामुळे दिवाळी साजरी कशी करायची या चिंतेत शेतकरी आहेत. त्यामुळे शासनाने आता शेतकºयांच्या पिकांना चांगला भाव देऊन शेतकºयांची दिवाळी चांगली झाली पाहिजे, हीच अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. 

सोयाबीनचे दिड कोटी अनुदान अद्याप आलेच नाही४मागीलवर्षी सोयाबीनची आवक चांगल्या प्रमाणात झाली होती. परंतु बाजारात सोयाबीनला भाव नव्हते. त्यामुळे शासनाने शेतकºयांना मदत करण्याच्या उद्देशाने सोयाबीनला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे हजारो शेतकºयांनी या अनुदानासाठी नोंदणी करुन दिलेली आहे. मात्र गेल्या ७ ते ८ महिन्यापासून या अनुदानाचे मेहकर तालुक्यातील जवळपास दिड कोटी रुपये शासनाकडे थकीत असून शासनाच्या निष्काळजीमुळे शेतकरी मात्र परेशान झाले आहेत.