शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मेहकर बाजार समितीत सोयाबीनची तीन हजार क्विंटलची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 19:39 IST

मेहकर : सोयाबीन पिक निघायला सुरुवात झाली असून, ४ आॅक्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे. मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देसोयाबीन पिक निघायला सुरुवात सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण 

उध्दव फंगाळ  लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : सोयाबीन पिक निघायला सुरुवात झाली असून, ४ आॅक्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे. मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.मेहकर तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी अधिक होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात पाऊस चांगला पडला असला तरीपण त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने याचा परिणाम सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिकांवर झाला आहे. अनेक शेतकºयांना एका एकरामध्ये केवळ ३ ते ४ क्विंटलची झडती लागली आहे. शेतकºयांना विविध बँकांकडून पेरणीच्या वेळेवर पिककर्ज मिळाले नसल्याने बहुतांश शेतकºयांनी उसनवार करुन तर उधारीवर बि-बियाणे, खते खरेदी करुन पेरणी केली आहे. मात्र पावसाने सुद्धा वेळेवर साथ दिल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. पाहिजे त्या प्रमाणात पिकांचे उत्पादन झाले नाही तर बाजारात सोयाबीनला २ हजार ५०० रुपये ते २ हजार ८०० रुपयेच भाव आहे. उडीद, मूग, तूर, चना, गहू या पिकांना सुद्धा भाव नाहीत. शेतात पेरणीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघतो का नाही, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. तर पेरणीसाठी लोकांकडून आणलेले पैसे, इतर उसनवार कशी फेडावी, या विवंचनेत शेतकरी दिसत आहेत. नुकताच दसरा सण झाला असून दिवाळी अवघ्या काही दिवसावर आली आहे. पिकांच्या उत्पादनात झालेली घट, बाजारात पिकांना भाव नसणे, यामुळे दिवाळी साजरी कशी करायची या चिंतेत शेतकरी आहेत. त्यामुळे शासनाने आता शेतकºयांच्या पिकांना चांगला भाव देऊन शेतकºयांची दिवाळी चांगली झाली पाहिजे, हीच अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. 

सोयाबीनचे दिड कोटी अनुदान अद्याप आलेच नाही४मागीलवर्षी सोयाबीनची आवक चांगल्या प्रमाणात झाली होती. परंतु बाजारात सोयाबीनला भाव नव्हते. त्यामुळे शासनाने शेतकºयांना मदत करण्याच्या उद्देशाने सोयाबीनला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे हजारो शेतकºयांनी या अनुदानासाठी नोंदणी करुन दिलेली आहे. मात्र गेल्या ७ ते ८ महिन्यापासून या अनुदानाचे मेहकर तालुक्यातील जवळपास दिड कोटी रुपये शासनाकडे थकीत असून शासनाच्या निष्काळजीमुळे शेतकरी मात्र परेशान झाले आहेत.