शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यात वर्षभरात तीन हजार अवयव प्रत्यारोपण

By admin | Updated: May 11, 2017 07:03 IST

४२३ प्रत्यारोपण केंद्रांचा समावेश; अवयव दानातून जपली माणुसकी

नीलेश शहाकार बुलडाणा : सामाजिक भान व माणुसकीचा धर्म जोपासत अवयव दानाची नवीन संकल्पना समाजात रुढ होत आहे. मृत्यूनंतर डोळे, मुत्रपिंड, यकृतापासून थेट हृदयापर्यंत दान करून ह्यमरावे परि अवयव रूपाने उरावेह्ण या संकल्पनेतून इतरांना नवजीवन मिळत आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने शासनाकडे सादर केलेल्या अहवालानुसार २०१६-१७ या वर्षात ३ हजार १५३ अवयव प्रत्यारोपणाची नोंद करण्यात आली आहे.मानवाचे सत्कर्म त्याचे अस्तित्व मृत्यूनंतरही भूतलावर प्रदीर्घ काळ कायम ठेवते; परंतु प्राण गेल्यानंतरही अवयवांच्या रूपाने आणखी काही काळ मनुष्य ईहलोकी राहू शकतात, हे वैज्ञानिक सत्य आहे. अर्थात त्यासाठी अवयव दान हा पर्याय प्रत्येकाकडे उपलब्ध आहे. अवयवच नव्हे, तर संपूर्ण शरीरच दान करणाऱ्यांच्या सामाजिकतेला ईश्वरी कार्य म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मानवी उपचारांकरिता तसेच मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री रोखण्याकरिता तत्संबंधी मानवी अवयव काढणे, जतन करणे, प्रत्यारोपण करणे यांचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम १९९४ लागू केला आहे. त्यामुळे अनुकूल कायदे, योग्य सरकारी धोरण, तत्पर आणि सुसज्ज रुग्णालये आणि माणुसकीची जाण ठेवणारे नागरिक यामुळे अवयव व देहदान करणारे पुढे येत आहेत.