शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

राज्यात वर्षभरात तीन हजार अवयव प्रत्यारोपण

By admin | Updated: May 11, 2017 07:03 IST

४२३ प्रत्यारोपण केंद्रांचा समावेश; अवयव दानातून जपली माणुसकी

नीलेश शहाकार बुलडाणा : सामाजिक भान व माणुसकीचा धर्म जोपासत अवयव दानाची नवीन संकल्पना समाजात रुढ होत आहे. मृत्यूनंतर डोळे, मुत्रपिंड, यकृतापासून थेट हृदयापर्यंत दान करून ह्यमरावे परि अवयव रूपाने उरावेह्ण या संकल्पनेतून इतरांना नवजीवन मिळत आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने शासनाकडे सादर केलेल्या अहवालानुसार २०१६-१७ या वर्षात ३ हजार १५३ अवयव प्रत्यारोपणाची नोंद करण्यात आली आहे.मानवाचे सत्कर्म त्याचे अस्तित्व मृत्यूनंतरही भूतलावर प्रदीर्घ काळ कायम ठेवते; परंतु प्राण गेल्यानंतरही अवयवांच्या रूपाने आणखी काही काळ मनुष्य ईहलोकी राहू शकतात, हे वैज्ञानिक सत्य आहे. अर्थात त्यासाठी अवयव दान हा पर्याय प्रत्येकाकडे उपलब्ध आहे. अवयवच नव्हे, तर संपूर्ण शरीरच दान करणाऱ्यांच्या सामाजिकतेला ईश्वरी कार्य म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मानवी उपचारांकरिता तसेच मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री रोखण्याकरिता तत्संबंधी मानवी अवयव काढणे, जतन करणे, प्रत्यारोपण करणे यांचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम १९९४ लागू केला आहे. त्यामुळे अनुकूल कायदे, योग्य सरकारी धोरण, तत्पर आणि सुसज्ज रुग्णालये आणि माणुसकीची जाण ठेवणारे नागरिक यामुळे अवयव व देहदान करणारे पुढे येत आहेत.