शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

पशुपालनाच्या तीन नव्या योजनांना हवी मुदतवाढ

By admin | Updated: August 10, 2015 23:08 IST

या योजनेपासून शेतकरी अनभिज्ञ असल्यामुळे जनजागृतीची गरज व्यक्त होत आहे.

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा : आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांसाठी पशुपालनाच्या तीन नव्या योजना शासनाने सुरू केल्या आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट असून, या योजनेबाबत जनजागृती न झाल्यामुळे याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी या योजनेबाबत जनजागृती करून, योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे. राज्यात नैसर्गिक आपत्ती व दुष्काळामुळे चाराटंचाई निर्माण झाल्याने शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे पशुपालनास प्रोत्साहन मिळावे, पशुव्यवसायाकडे शेतकरी वळावा, यासाठी शासनाने तीन नव्या योजना १ जुलैपासून सुरू केल्या होत्या. राज्यशासनाकडून सहा दुधाळ गाई, म्हशी गट वाटप, ५0 टक्के अनुदानातून शेळी गटाचे वाटप तसेच ५0 टक्के अनुदानातून मांसल कुक्कुट पक्षी पालन योजनोचा यामध्ये समावेश आहे. यासाठी दारिद्रय रेषेखालील, बचतगट, बेरोजगार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जुलै २0१५ पासून सुरू करण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट २0१५ आहे. योजना सुरू झाल्यानंतर जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत या योजनेबाबत पुरेसी जनजागृती न केल्यामुळे अनेक शेतकरी योजनांपासून वंचित आहेत. या योजनांची माहिती अनेक शेतकर्‍यांपर्यंंत पोहचलीच नसल्याने, मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.*शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरजमान्सूनचा पाऊस झाल्यानंतर पावसाने जवळपास दीड महिना दडी मारली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना शासनाच्या या योजनांबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा पशुपालन व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यामुळे पशुपालन व्यवसाय वाढण्यास मदत होईल.