शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पशुपालनाच्या तीन नव्या योजनांना हवी मुदतवाढ

By admin | Updated: August 10, 2015 23:08 IST

या योजनेपासून शेतकरी अनभिज्ञ असल्यामुळे जनजागृतीची गरज व्यक्त होत आहे.

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा : आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांसाठी पशुपालनाच्या तीन नव्या योजना शासनाने सुरू केल्या आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट असून, या योजनेबाबत जनजागृती न झाल्यामुळे याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी या योजनेबाबत जनजागृती करून, योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे. राज्यात नैसर्गिक आपत्ती व दुष्काळामुळे चाराटंचाई निर्माण झाल्याने शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे पशुपालनास प्रोत्साहन मिळावे, पशुव्यवसायाकडे शेतकरी वळावा, यासाठी शासनाने तीन नव्या योजना १ जुलैपासून सुरू केल्या होत्या. राज्यशासनाकडून सहा दुधाळ गाई, म्हशी गट वाटप, ५0 टक्के अनुदानातून शेळी गटाचे वाटप तसेच ५0 टक्के अनुदानातून मांसल कुक्कुट पक्षी पालन योजनोचा यामध्ये समावेश आहे. यासाठी दारिद्रय रेषेखालील, बचतगट, बेरोजगार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जुलै २0१५ पासून सुरू करण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट २0१५ आहे. योजना सुरू झाल्यानंतर जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत या योजनेबाबत पुरेसी जनजागृती न केल्यामुळे अनेक शेतकरी योजनांपासून वंचित आहेत. या योजनांची माहिती अनेक शेतकर्‍यांपर्यंंत पोहचलीच नसल्याने, मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.*शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरजमान्सूनचा पाऊस झाल्यानंतर पावसाने जवळपास दीड महिना दडी मारली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना शासनाच्या या योजनांबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा पशुपालन व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यामुळे पशुपालन व्यवसाय वाढण्यास मदत होईल.