शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित!

By admin | Updated: September 22, 2016 01:34 IST

महसूल आणि कृषी विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे जुळता जुळेना लाभार्थींच्या रकमेचा आकडा!

गणेश मापारी खामगाव(जि. बुलडाणा)-गतवर्षी पीक विमा न काढलेल्या शेतकर्‍यांना विम्याच्या निम्मे रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी मार्च महिन्यात शे तकर्‍यांची माहिती मागविण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंतही बुलडाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे २ लाख ९९ हजार २७९ सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. गत तीन-चार वर्षांपासून शेतकर्‍यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून ठोस अशी काहीही मदत न मिळाल्यामुळे पीक विमा योजनेने शेतकर्‍यांना काहिसा दिलासा दिला आहे. मात्र पीक विमा न काढलेल्या शेतकर्‍यांकडे पेरणीचीसुद्धा सोय नाही, ही बाब हेरुन शासनाने औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या चार विभागा तील कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकर्‍यांना मदत करण्याचा निर्णय फेब्रुवारी २0१६ मध्ये घेतला. औरंगाबाद आणि नाशिक विभागातील कापूस उत्पादक शे तकर्‍यांसाठी, तर अमरावती व नागपूर विभागातील सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकर्‍यांना मदत देण्याची योजना शासनाने आखली. पीक विमा न काढलेल्या शेतकर्‍यांना पीक विम्याच्या निम्मे रक्कम मदत म्हणून देण्यासाठी या चारही विभागातील कापूस, सोयाबीन व धान उत्पादक शेतकर्‍यांची माहिती मागविण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक व पीक विमा न काढलेल्या शेतकर्‍यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पीक विमा न काढलेल्या सोयाबीन उत्पादक शे तकर्‍यांची माहिती शासनाला देणे अपेक्षित होते. मात्र, महसूल व कृषी विभागाकडून अद्यापपर्यंतही जिल्ह्यातील पीक विमा न काढलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची माहिती शासनाला गेलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी शासकीय मदतपासून वंचित आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानंतरही या शेतकर्‍यांची माहिती देण्यासाठी महसूल प्रशासनाला सहा महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे प्रशासनाची उदासीनताच शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत असल्याचा आरो प केला जात आहे. महसूलची आकडेवारी कृषी विभागाकडे!महसूल विभागाकडे शेतकर्‍यांची आकडेवारी आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील शेतकर्‍यांची संख्या नमुना ८-अ वरुन काढण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालु क्यांमध्ये गतवर्षी विमा न काढलेल्या शेतकर्‍यांची संख्या ही जवळपास तीन लाख एवढी असल्याचे महसूल विभागाकडून कळविण्यात आले आहे. त्यानुसार ही सर्व माहिती कृषी विभागाला तपासणीसाठी देण्यात आली आहे. कृषी विभागाने बँकांकडून गतवर्षी खरिपाचा पीक विमा उतरविलेल्या शेतकर्‍यांची माहिती घेतली आहे. आणि आता कृषी विभाग महसूल विभागाकडून आलेल्या माहितीशी जुळवाजुळव करीत आहे. मदतीच्या रकमेचा गोंधळातवर्षी विमा न काढलेल्या शेतकर्‍यांची माहिती संकलित करण्यासाठी कृषी व महसूल विभागाकडून टोलवाटोलवी करण्यात आली. परिणामी शेतकर्‍यांची माहिती संकलित करण्यासाठी तब्बल सात महिन्यांचा कालावधी लागला. असे असतानाही शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ठरविण्यात आलेल्या आकड्यांमध्ये प्रचंड गोंधळ असल्याची माहिती आहे. १८५ कोटी रुपयांचा आकडा शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे ठेवण्यात आला आहे. विम्यास पात्र असलेल्या मदतीचा निकषच यासाठी लावण्यात आला आहे. मात्र विम्याच्या निम्मे रक्कम सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना मिळणार असल्याने हा आकडा मोठय़ा प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.'त्या' ८६ हजार शेतकर्‍यांना मिळावा लाभगतवर्षी खरिपाचा पीक विमा न उतरविलेल्या शेतकर्‍यांना मदत देण्याची ही योजना आहे. जिल्ह्यातील ३ लाख ६३ हजार २४६ शेतकर्‍यांनी गेल्यावर्षी पीक विमा उतरविला आहे. यापैकी ८६ हजार ३३८ शेतकर्‍यांना पीक विम्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकर्‍यांना पीक विम्याची मदत मिळालेली नाही. तर पीक विमा न उतरविलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनाच मदत देण्याची योजना शासनाने आखली आहे. त्यामुळे पीक विमा काढून विम्यासाठी अपात्र ठरविण्यात आलेले शेतकरी अधांतरीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेतून अशा शेतकर्‍यांनाही मदत देण्याची मागणी होत आहे.