शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३९ ग्रामपंचायतींपैकी तीन सरपंच अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:41 IST

लोणार: तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील ३ ग्रामपंचायत  सरपंच पद अविरोध झाल्याने आता ३६ जागांच्या सरपंच  पदासाठी १0९ व सदस्य पदासाठी ५९0 उमेदवार रिंगणात आहे त. सरपंच पद जनतेतून असल्यामुळे गावाच्या विकासासाठी  सक्षम व प्रामाणिक उमेदवार निवडीसाठी गावकरी मतदार सज्ज  झाले असून, त्यांच्याही पारावर बैठका भरत आहेत. तर कॉर्नर  मिटिंगमध्ये उमेदवार, गावपुढारी व पक्षाचे नेते व्यस्त दिसून येत  आहे.

ठळक मुद्देसरपंच पदासाठी १0९ उमेदवार रिंगणात सदस्य पदासाठी ५९0 उमेदवार रिंगणात 

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील ३ ग्रामपंचायत  सरपंच पद अविरोध झाल्याने आता ३६ जागांच्या सरपंच  पदासाठी १0९ व सदस्य पदासाठी ५९0 उमेदवार रिंगणात आहे त. सरपंच पद जनतेतून असल्यामुळे गावाच्या विकासासाठी  सक्षम व प्रामाणिक उमेदवार निवडीसाठी गावकरी मतदार सज्ज  झाले असून, त्यांच्याही पारावर बैठका भरत आहेत. तर कॉर्नर  मिटिंगमध्ये उमेदवार, गावपुढारी व पक्षाचे नेते व्यस्त दिसून येत  आहे.७ ऑक्टोबर रोजी सरपंच व सदस्यासाठी मतदान होणार आहे.  त्यासाठी गावागावात सरपंच पदाचे दावेदार हे मोर्चा बांधणीच्या  कामाला लागले असून, आपापल्या मतदारांशी संपर्क साधून  आहेत. ग्रामीण भागाशी निगडित आणि ग्रामीण भागाचा कणा  असलेल्या या निवडणुकीमुळे चुरशीचे वातावरण तयार झाले  आहे. पहिल्यांदाच सरपंच पद हे जनतेतून असल्यामुळे  गावागावात शक्ती प्रदर्शन निर्माण सुरू झालेले दिसून येत आहे.  ३९ ग्रामपंचायतींपैकी ३ ग्रामपंचायत सरपंच पद  व ५८ ग्राम पंचायत सदस्य अविरोध झालेले आहे. सरपंच पदासाठी  नामनिर्देशन पत्र भरलेल्या पैकी ७६ जणांनी माघार घेतली  असून, सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या पैकी  १५३ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणुकीत  आपलाच विजय व्हावा यासाठी अर्ज माघार न घेतलेल्या गावात  राजकीय वातावरण तापले आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून  प्रामाणिक उमेदवारच असायला हवा यासाठी गावकर्‍यांनीही  एकजूट दाखवायला सुरुवात केल्याने काही पक्ष कार्यकर्त्यांची  चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येत आहे. गावाच्या  विकासासाठी शासनाच्या विविध योजना आणून गावात  राबविणारा सुशिक्षित आणि प्रामाणिक उमेदवार निवडीसाठी  अनेक गावात पारावर गावकर्‍यांच्या  बैठका बसत आहेत.  यामुळे ‘चुका पदरात घ्या आणि एक शेवटची संधी द्या’ अशा  गावपुढार्‍यांच्या भूलथापा ग्रामीण भागात सध्या ऐकावयास मिळ त आहेत.