शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील मोठे प्रकल्प तहानलेलेच!

By admin | Updated: June 30, 2017 00:02 IST

जिल्ह्याचा काही भाग सोडला, तर अजूनही पाऊस सर्वसाधारणच पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

ओमप्रकाश देवकर । लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : दमदार पावसाची अपेक्षा असतानाही जिल्ह्याचा काही भाग सोडला, तर अजूनही पाऊस सर्वसाधारणच पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी केली असता काही भागात पिके जोमात असून, या पिकात आंतरमशागतीची कामे सुरु आहेत. जिल्ह्यात पावसाने मृग नक्षत्रात चांगली सुरुवात केली. मात्र, सार्वत्रिक पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या काही दिवसांच्या फरकाने मागेपुढे झाल्या आहेत. मेहकर तालुक्यात सर्वसाधारण पाऊस असला, तरी पिके चांगलीच तग धरुन आहेत. यामध्ये काही शेतकरी तण नियंत्रणासाठी निंदण करीत आहेत, तर काही तणनाशकाची फवारणी करीत आहेत. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी डवरणी सुरु केली आहे. मेहकर तालुक्यात २०१६-१७ मध्ये याच दिवशी १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. २०१७-१८ मध्ये आजपर्यंत २६५ मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसाने खरिपाची पेरणी साध्य झालेली असून, काही ठिकाणी कमी काळात जास्त पाऊस झाल्याने पेरणी उलटली आहे. जास्त पावसामुळे बियाणे उगवलेच नसल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.या पावसाने लघू जलसाठे जरी भरले असले, तरी जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत. यामध्ये मोठे प्रकल्प नळगंगा या प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित साठा ६९.३२ दलघमी असून, आजचा पाणीसाठा १३.८२ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी १९.९४ आहे. याचप्रमाणे पेनटाकळी प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित साठा ५९.९७ दलघमी असून, आजचा पाणीसाठा ४.६५ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी ७.७५ टक्के आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा प्रकल्पीय साठा ९३.४० दलघमी असून, आजचा पाणीसाठा ६.२६ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी ६.७० टक्के आहे. याचप्रमाणे मध्यम प्रकल्प पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी या प्रकल्पातील आजरोजी संचित जलसाठ्याची स्थिती जेमतेम अशीच आहे. जिल्ह्यातील अनेक मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेले असल्याने संकल्पित प्रमाणानुसार जलसाठे भरण्यासाठी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे.सध्याच्या पावसावर पीक परिस्थिती समाधानकारकजिल्ह्यात पाऊस सर्वत्र समप्रमाणात पडलेला नसला, तरी पिकांना सद्यस्थितीत तग धरुन ठेवण्यासाठी लागणारा पाऊस मात्र जवळपास प्रत्येक तालुक्यात पडलेला आहे. त्यामुळे सध्याच्या पावसावर जिल्ह्यातील पीक परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र, जलसाठे व पुढील पीक वाढीसाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा आहे.