शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील मोठे प्रकल्प तहानलेलेच!

By admin | Updated: June 30, 2017 00:02 IST

जिल्ह्याचा काही भाग सोडला, तर अजूनही पाऊस सर्वसाधारणच पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

ओमप्रकाश देवकर । लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : दमदार पावसाची अपेक्षा असतानाही जिल्ह्याचा काही भाग सोडला, तर अजूनही पाऊस सर्वसाधारणच पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी केली असता काही भागात पिके जोमात असून, या पिकात आंतरमशागतीची कामे सुरु आहेत. जिल्ह्यात पावसाने मृग नक्षत्रात चांगली सुरुवात केली. मात्र, सार्वत्रिक पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या काही दिवसांच्या फरकाने मागेपुढे झाल्या आहेत. मेहकर तालुक्यात सर्वसाधारण पाऊस असला, तरी पिके चांगलीच तग धरुन आहेत. यामध्ये काही शेतकरी तण नियंत्रणासाठी निंदण करीत आहेत, तर काही तणनाशकाची फवारणी करीत आहेत. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी डवरणी सुरु केली आहे. मेहकर तालुक्यात २०१६-१७ मध्ये याच दिवशी १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. २०१७-१८ मध्ये आजपर्यंत २६५ मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसाने खरिपाची पेरणी साध्य झालेली असून, काही ठिकाणी कमी काळात जास्त पाऊस झाल्याने पेरणी उलटली आहे. जास्त पावसामुळे बियाणे उगवलेच नसल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.या पावसाने लघू जलसाठे जरी भरले असले, तरी जिल्ह्यातील मोठे प्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत. यामध्ये मोठे प्रकल्प नळगंगा या प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित साठा ६९.३२ दलघमी असून, आजचा पाणीसाठा १३.८२ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी १९.९४ आहे. याचप्रमाणे पेनटाकळी प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित साठा ५९.९७ दलघमी असून, आजचा पाणीसाठा ४.६५ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी ७.७५ टक्के आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा प्रकल्पीय साठा ९३.४० दलघमी असून, आजचा पाणीसाठा ६.२६ दलघमी एवढा असून, त्याची टक्केवारी ६.७० टक्के आहे. याचप्रमाणे मध्यम प्रकल्प पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी या प्रकल्पातील आजरोजी संचित जलसाठ्याची स्थिती जेमतेम अशीच आहे. जिल्ह्यातील अनेक मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेले असल्याने संकल्पित प्रमाणानुसार जलसाठे भरण्यासाठी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे.सध्याच्या पावसावर पीक परिस्थिती समाधानकारकजिल्ह्यात पाऊस सर्वत्र समप्रमाणात पडलेला नसला, तरी पिकांना सद्यस्थितीत तग धरुन ठेवण्यासाठी लागणारा पाऊस मात्र जवळपास प्रत्येक तालुक्यात पडलेला आहे. त्यामुळे सध्याच्या पावसावर जिल्ह्यातील पीक परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र, जलसाठे व पुढील पीक वाढीसाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा आहे.