शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हजारो जनावरांचा मृत्यू

By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST

वातावरणात बदल : अशक्तपणामुळे जात आहेत जीव

खामगाव : गत काही दिवसांमध्ये राज्यात विविध भागांमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त जनावरे मृत्यूमुखी पडली. चारा टंचाई, पाण्याची समस्या आणि वातावरणातील बदलाचा परिणाम होवून जनावरांना अशक्तपणा आला आणि त्यामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस उशिरा सुरु झाला. त्यामुळे बर्‍याच भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाचे हे बिघडलेले चक्र जनावरांसाठी घातक ठरत आहेत. वातावरणात होणारे बदल हे जनावरांना न पेलवणारे आहेत. त्यांना नेमका कोणता आजार झाला, याचे निदान झाले नाही. काही भागांमध्ये जनावरांना मुबलक चारा मिळाला नाही, म्हणून दगावली. काही भागात चारा असूनही वातावरणातील बदल सहन न झाल्याने जनावरांमध्ये अशक्तपणा येवून ती मरण पावल्याचे वैद्यकिय अहवालात म्हटले आहे. गत दोन, तीन आठवड्यांमध्ये काही भागात जोरदार पाऊस झाला. सलग तीन-चार दिवस पाऊस सुरु असल्यानेही जनावरांची देखभाल करता आली नाही. त्यामुळे जनावरे मरण पावली. जनावरांवर अशा प्रकारचे नैसर्गिक संकट आल्याने ते रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होत आहेत. जनावरांना लसी देण्याचे काम मोठय़ा प्रमाणात होत आहे. राज्यात मरण पावलेल्या जनावरांचा सर्वे करुन निकषाप्रमाणे मदत दिली जाणार असल्याची माहीती मदत व पुनर्वसन विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.